‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या लोकप्रिय मालिकांमधून अभिनेता ऋषिकेश शेलार घराघरांत पोहोचला. मराठी मनोरंजनसृष्टीत त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच त्याने ‘राजश्री मराठी’च्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ऋषिकेशने दिवंगत अभिनेते इरफान खान यांना फोन केला होता. त्याने त्यांच्याशी नेमका काय संवाद साधला? जाणून घेऊयात…

ऋषिकेश शेलार दिवंगत अभिनेते इरफान खान यांना फोन करून म्हणाला, “नमस्कार, इरफान कसा आहेस माझ्या भावा? माझ्यासारख्या असंख्य अभिनेत्यांना तू मोठ्या भावासारखा आहेस. तू फार लवकर गेलास पण, आमच्यामध्ये आजही तू आहेस…आमच्या सगळ्यांमध्ये आज एक-एक इरफान आहे आणि हीच तुझी खरी ताकद आहे. तू जयपूरचा अन् कोण कुठला मी सांगलीचा एक मुलगा…तू गेल्यानंतर खूप रडलो. माझ्यासारखे असंख्य लोक त्यादिवशी रडले असतील.”

Salman Khan
जेव्हा सलमान खानने जवळून पाहिलेला मृत्यू; म्हणाला, “४५ मिनिटं विमानाच्या इंजिनाचा…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
salman khan
“मी जेव्हा तुरुंगात…”, बॉलीवूड अभिनेता सलमान खान म्हणाला, “मी थकलोय…”
Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
Salman Khan And Shahrukh Khan
राकेश रोशन गाढ झोपेत असताना सलमान-शाहरूख खान त्यांच्या खोलीबाहेर गोळीबार…; दिग्दर्शक म्हणाले, “त्यांची सीमारेषा…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”

हेही वाचा : खरा कलाकार कोण असतो हे पुन्हा स्वराज सिद्ध करणार; ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये आजच्या भागात काय घडणार? जाणून घ्या

“इरफान तू कॅमेराचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवून दिलास म्हणून आज ग्रेट आहेस. तू दाखवलेल्या वाटेवरून पुढे जाणं हे आता सोपं वाटतंय पण, ज्या पद्धतीचं काम तू केलंस त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. तुझ्यासारखं काम करणं खरंच अवघड आहे. स्वत:वरचा विश्वास ढळू न देता तू वेगळं काम करत राहिलास आणि आज लोक बोलतात इरफान खान साहेबांसारखं काम करा…ही किती मोठी गोष्ट आहे.” हे सांगताना ऋषिकेश काहीसा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : उमेश कामत-प्रिया बापट यांच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाचा आगामी प्रयोग रद्द, कारण सांगत म्हणाले…

शेवटी हा आभासी फोन ठेवताना ऋषिकेश शेलार म्हणाला, “या जन्मात आपली भेट होऊ शकली नाही ही खंत माझ्या मनात कायम राहणार! तू नेहमी म्हणतोस ना, ‘जहाँ जायेगा वहीं रौशनी लुटाएगा किसी चराग़ का अपना मकाँ नहीं होता’ तू तिथेही सर्वांना प्रकाश देत असशील. तुझ्या नावावरून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलंय, त्यामुळे तिच्या डोळ्यात मी जेव्हा-जेव्हा बघेन… तेव्हा मला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. मी कधीच पाट्या टाकणार नाही.”

Story img Loader