Bigg Boss Marathi 5 चे पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. घराबाहेर पडल्यानंतरदेखील या स्पर्धकांची मोठी चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. जान्हवी किल्लेकर ही चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे.

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?

जान्हवीने नुकतीच ‘मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ९ लाख रुपये घेऊन येण्याच्या निर्णयाबद्दल विचारले. त्यावर तिने म्हटले, “मी पैशाची बॅग घेतली. मला वाईट वाटत होतं. पण जेव्हा रितेश सरांनी एन्व्हलप उघडलं आणि सांगितलं की जान्हवी तुमचंच नाव आहे. त्यावेळी मला जीवात जीव आला. मी योग्य निर्णय घेतल्यामुळे बरे वाटले. जर मी ते पैसे उचलले नसते तर मी बाहेर जाणार होते, त्यामुळे हाती शून्य राहिलं असतं. जर मी ते पैसे घेतले नसते तर मला अपराधी वाटलं असतं. बिग बॉसने संधी दिली होती. पैसे चोरी करायचे नव्हते. सगळ्या सदस्यांच्या हक्काचे पैसे होते. बिग बॉसने सगळ्यांना संधी दिली होती.”

पुढे बोलताना जान्हवीने म्हटले, “जेव्हा सात लाखांसाठी विचारले तेव्हा मी विचार करत होते. मला वाटलं की लोक मला पुन्हा ट्रोल करतील. पण खरं सांगू का आम्ही आत जरी असलो तरी दिसत होतं की टॉप ३ कोण असणार आहे. मला वाटतं होते की आता पर्यंत लक्षात राहिले लोकांच्या, जाता-जातादेखील लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. वेगळं काय करू शकते. टॉप ३ मला माहित आहे, चौथी येऊन काय करणार आहे? काय मिळणार आहे. तर मी विचार केला आणि बॅग उचलली. बझर दाबला आणि कारणही सांगितलं. ते कारणदेखील अगदी खरं होतं. चुका खूप झाल्या आहेत, त्यामुळे इतक्या लवकर महाराष्ट्र माफ करणार नाही. त्यांच्याकडून अशी अपेक्षादेखील करू शकत नाही. कारण- ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. माझी चूक झाली आहे. थोडा वेळ जावा लागेल, त्या गोष्टीला. इतक्या पटकन काही होऊ शकत नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात शेवटचं प्रायश्चित म्हणून मी माझं नाव शोमधून काढते, असं म्हणून मी बझर दाबला”, असे जान्हवीने म्हटले आहे.

हेही वाचा: “कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज चव्हाण जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर; म्हणाले, “बुक्कीत टेंगुळ आणणारा तो…”

दरम्यान, जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी ५ च्या घरात नेहमीच चर्चेत राहिली. कधी तिच्या भांडणामुळे, वागण्यामुळे तर कधी टास्कमुळे तीची मोठी चर्चा झाली. आता ९ लाख घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत आहे.