‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या १५ व्या पर्वाला १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात करण्यात आली होती. या सीझनचा शेवटचा एपिसोड २९ डिसेंबर रोजी प्रसारित झाला. १५ वा सीझन संपताना ‘बिग बी’ भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या शेवटच्या भागात ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर, विद्या बालन आणि सारा अली खान सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या भागात प्रेक्षकांना अनेक जुने व रंजन किस्से ऐकायला मिळाले. पण, या पर्वाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन भावुक झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या सीझनचा पहिला प्रोमो १८ एप्रिल २०२३ रोजी लॉन्च करण्यात आला होता. यानंतर ऑगस्टमध्ये या पर्वाची सुरूवात करण्यात आली होती. जवळपास ४ महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता या सीझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अमिताभ यांनी यंदाच्या केबीसीमध्ये स्पर्धकांबरोबर अनेक किस्से, आठवणी व करिअरमधील मजेशीर प्रसंग शेअर केले.

Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Samay Raina Asks Amitabh Bachchan For Property Mein Hissa
अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ डायलॉग अन् समय रैनाने मागितला संपत्तीत हिस्सा, केबीसीतील व्हिडीओ तुफान व्हायरल
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”
Amitabh Bachchan recalls how Shatrughan Sinha would make him push his car on Marine Drive
अमिताभ बच्चन यांना कारला धक्का द्यायला सांगायचे शत्रुघ्न सिन्हा; स्वतः केलेला खुलासा, म्हणालेले, “हे महाशय…”
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
Sam Konstas Statement on Virat Kohli Shoulder Bump in BGT Said I Have No Regrets
Kostas-Kohli Fight: “मला कोणताच पश्चाताप नाही”, विराटबरोबरच्या वादावर कॉन्स्टासचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी तो व्हीडिओ…”
मराठी चित्रपट मागे पडण्यामागचं महेश मांजरेकरांनी सांगितलं ‘हे’ कारण, म्हणाले, “सिनेसृष्टीत सर्वच ‘अभिमन्यू’, पण…”

हेही वाचा : Video : ‘ओले आले’चा नेमका अर्थ काय? कलाकारांनीच केला खुलासा, पाहा विशेष मुलाखत

१५ व्या सीझनची सांगता करताना अमिताभ म्हणाले, “माझ्या प्रिय मित्रांनो, सांगताना अतिशय जड जातंय पण, उद्यापासून आपली भेट होणार नाही. उद्यापासून हा रंगमंच सजणार नाही. अलविदा प्रेक्षकहो…हे सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती पण, आज या मंचावरून शेवटचं म्हणतोय…शुभ रात्री शुभ रात्री.” प्रेक्षकांना निरोप देताना अमिताभ यांचा कंठ दाटून आला होता.

हेही वाचा : वर्षअखेरीस जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ने मारली बाजी! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ आहेत टॉप १० मालिका, पाहा संपूर्ण यादी

अमिताभ यांच्या भाषणानंतर प्रेक्षकांनी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एक प्रेक्षक महिला म्हणते, “आमच्यापैकी देव कोणीही पाहिला नाही…पण आम्ही देवाच्या सर्वात आवडत्या व्यक्तीला भेटलो.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी लवकरात लवकर ‘केबीसी’चं पुढचं पर्व सुरू करण्याची मागणी केली आहे.

Story img Loader