Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: रील स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. लोकांनी त्याच्या विजयावर जल्लोष केला, तर काही सेलिब्रिटींनी मात्र हा सहानुभूतीचा खेळ असल्याचं म्हणत त्याच्यावर टीका केली. बऱ्याच जणांना सीझनमध्ये ‘जेंटलमन’चा टॅग मिळालेला अभिजीत सावंत विजेता व्हावा असं वाटत होतं. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरजच्या विजयानंतर होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सूरज चव्हाण जिंकल्यावर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेकांना हा निर्णय पटला नव्हता. खेळच्या दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास सूरजपेक्षा अभिजीतसह इतरही अनेक जण डिझर्व्हिंग होते, असं म्हटलं गेलं. काहींनी पोस्ट केल्या आणि नंतर डिलीटही केल्या होत्या. केदार शिंदे यांनी यावर त्यांचं मत मांडलं आहे. तसेच प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचाच आम्ही आदर केला आहे असं त्यांनी नमूद केलं.

Bigg Boss 18 Gunratan Sadavarte New Promo Viral
Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या घरात गुणरत्न सदावर्तेंची भाजपा नेत्याशी झाली चांगली मैत्री; म्हणाले, “या जन्मात…”, पाहा प्रोमो
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
pravin tarde Post for Suraj Chavan bigg boss marathi 5
सूरज चव्हाणने Bigg Boss Marathi 5 जिंकल्यावर प्रवीण तरडेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
Vaibhav Chavan And Suraj Chavan
“महाराष्ट्राने त्याला डोक्यावर…”, वैभव चव्हाण सूरज चव्हाणविषयी बोलताना म्हणाला, “मला बघायचंय…”
arbaz patel bigg boss marathi fame contestant talks about marriage
“हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर २ लग्न करणार का?” अरबाज पटेल म्हणाला, “आमच्या धर्मात चार…”
Arvind Kejriwal five questions to RSS chief Mohan Bhagwat
Arvind Kejriwal: ‘मुलगा आईलाच डोळे दाखवायला लागला’, मोहन भागवत यांना ५ प्रश्न विचारत केजरीवाल यांची मोदींवर टीका
Vivek Oberoi talks about ex girlfriends
“मी मनापासून प्रेम केलं,” विवेक ओबेरॉयचं वक्तव्य; म्हणाला, “माझ्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड्स…”
Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan Talk About Friendship With Arbaz Patel
“त्याच रडणं…”, अरबाज पटेलबरोबरच्या मैत्रीबद्दल स्पष्टच बोलला वैभव चव्हाण; म्हणाला, “माझा स्वभाव मला नडला”

हेही वाचा – Video: “तू माझी हिरोईन आहेस”, सूरज चव्हाणला भेटायली आली ‘ती’; नेटकरी म्हणाले, “हीच आमची वहिनी शोभेल”

अभिजीत व सूरज टॉप २ मध्ये होते आणि सूरज जिंकला. अनेकांना वाटलं होतं की अभिजीत जिंकेल. सूरज जिंकल्यावर मनोरंजनसृष्टीतून अनेक पोस्ट आल्या, त्यात हा ‘सिंपथी गेम’ होता का? असं अनेकांनी लिहिलं. यावर मत विचारल्यावर केदार शिंदे लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “बिग बॉस हा लोकांच्या वोटिंगचा गेम आहे. त्यामुळे जर मी ही गोष्ट उलट केली असती आणि सूरज जिंकला नसता, तर मग काय झालं असतं? याचा विचारही करण्याची गरज आहे. कारण लोकांच्या भावना आहेत की आम्ही वोट केलंय आणि आम्ही ज्यांना वोट केलंय तोच माणूस जिंकायला पाहिजे.”

हेही वाचा – रितेश भाऊंचा फुल्ल सपोर्ट! सूरज चव्हाणची भविष्यात आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय; दिली ‘ही’ खास भेट

सूरज चव्हाण छक्के-पंजे खेळत नव्हता – केदार शिंदे

पुढे ते म्हणाले, “जे चित्र आता मी बघतोय त्यावरून लोकांचं सूरजबद्दलचं ते प्रेम होतं आणि ते प्रेम अभिजीतच्या मनामध्येही होतं. तुम्ही पूर्ण सीझन पाहिला असेल तर जेव्हा जेव्हा सूरज त्याला म्हणाला की ‘मला ट्रॉफी पाहिजे,’ तर अभिजीतने खूप मोठ्या मनाने सांगितलंय की ‘तुलाच मिळो ट्रॉफी’. हे तो संपूर्ण सीझनमध्ये बऱ्याच वेळा बोलला आहे. सूरज हा काही खेळाडू नव्हता, छक्के-पंजे खेळत नव्हता, तो जसा बाहेर आहे, तसाच आतमध्येही होता. मला अभिजीत आवडला होता. मात्र काही लोकांनी मनाने विचार केला, काही लोक डोक्याने विचार करतात. आता मेंदू श्रेष्ठ की मन श्रेष्ठ यावर चर्चा होऊ शकते. आमच्याकडून, कलर्स मराठीकडून त्या मतांचा आदर राखला गेला, जी मतं फक्त महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून आली होती. त्या मतांचंच फळ म्हणजे सूरज चव्हाण आज विजेता आहे.”