मराठीतील लोकप्रिय अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियावर आपली मतं मांडत असतात. ते फेसबूकवर पोस्ट करून अभिनयक्षेत्र, राजकीय व सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देत असतात. आता त्यांनी एक पोस्ट केली आहे, या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण माने यांनी छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करत पोस्ट केली आहे. “छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा केला पण तो शत्रूविरूद्ध केला. त्यावेळचा समाज अज्ञानी, अशिक्षित असूनही शिवरायांनी त्यांचा गैरफायदा घेतला नाही. हल्ली आपल्याच माणसांच्या विरोधात गनिमी कावा करणाऱ्यांची सद्दी आहे. विशेष म्हणजे शिकले-सवरलेले लोक अशा भामट्यांची ‘अंधभक्ती’ करतात,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Manoj Jarange, Parivartan Mahashakt,
मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीत यावे, संभाजीराजे भोसले यांची भूमिका
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं, ज्या मराठ्यांनी…”; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in His Speech
Raj Thackeray : “उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत, सारखं अब्दाली आला, अफझल खान आला, अरे..”; राज ठाकरेंनी उडवली खिल्ली
dhananjay munde criticized manoj jarange patil
नारायणगडावरील दसऱ्या मेळाव्यावरून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “नवीन मेळावा सुरु करून…”
women raped in Bopdev Ghat Pune
Bopdev Ghat Crime : “तरुणाला बांधलं आणि त्यानंतर २१ वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार..”, पोलिसांनी सांगितला बोपदेव घाटातला घटनाक्रम
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
Bhaskar Jadhav Shivaji maharaj
भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव

कॅन्सरशी झुंज अपयशी, समांतर सिनेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीला मुजुमदार यांचे निधन

किरण मानेंच्या या पोस्टवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘बरोबर याचं महत्वाचं कारण जर कोणतं असेल.. तर शिवरायांनी ती माणसं माझी आहेत असं समजून केलं होतं. तर आताचे हे सर्व गद्दार ही सगळी लोक माझ्यामुळे आहेत असं समजतात. हाच फरक शिवरायांच्या विचारात आणि यांच्यामध्ये आहेस,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘नक्कीच, शिवरायांनी गनिमीकावा स्वराज्याच्या शत्रुविरुद्ध केला, स्वतःच्या लोकांविरुद्ध नव्हे,’ असं एका युजरने म्हटलं आहे.