आज महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला होता. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

“मला मनस्ताप होतो” एमसी स्टॅनवर चिडला अब्दु रोझिक; म्हणाला, “मी त्याला फोन केल्यावर…”

River Life-giving Riverside River Description
तळटीपा: नदीच्या किनारी…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
due to Atal Setu and Uran Nerul Local are supplying lowpressure water to high rises buildings in Dronagiri
द्रोणागिरी नोड मध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा, सिडकोवर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ
Mahakumbh , ABVP ,
…तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकुंभात स्नान करणारे पाहिले असते, एबीव्हीपीच्या नेत्याचे वादग्रस्त विधान
Stampede at Maha Kumbh
Mahakumbh 2025 Stampede : कुणाची पत्नी हरवली, कुणी जखमी झालं तर कुणी…, चेंगराचेंगरी अनुभवणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Anjali Damania Post About Dhanajay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांची पोस्ट, “माझा आणि अजित पवारांचा ३६ चा आकडा आहे, पण धनंजय मुंडे….”
Construction of large water channels begins in Gorai Mumbai news
गोराईमध्ये मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात; काही गावांमध्ये पालिकेच्या कामाला विरोध
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण

किरण माने यांनी त्यांचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिलंय. “…चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही…आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तर तुम्ही-आम्ही काय मेलो नव्हतो. त्यामुळे चवदार तळ्यावर केवळ पाणी पिण्यासाठी जायचे नसून, इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी !”
…चवदार तळे, महाड !,
असं किरण माने यांनी लिहिलं आहे.

किरण माने यांनी पोस्ट शेअर करताना लिहिलेलं कॅप्शन हे बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द आहेत. “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे,” असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना म्हणाले होते.

Story img Loader