काही महिन्यांपूर्वी झी मराठीवर ‘लोकमान्य’ ही मालिका सुरू झाली. ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर त्याच्या जागी नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. परंतु आता ही मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, दोघांमधील नात्याबद्दल कळल्यावर ‘अशी’ होती मुग्धा वैशंपायनची प्रतिक्रिया

ही मालिका सुरू झाली तेव्हा या मालिकेचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. वेगळ्या विषयावरील मालिका घेऊन आल्याबद्दल प्रेक्षकांनी वाहिनी आणि निर्मात्यांचंही कौतुक केलं. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले. या मालिकेतील कलाकार सेटवर घडणाऱ्या घडामोडी सोशल मीडिया वरून चाहत्यांशी शेअर करत असतात. पण आता टीआरपीच्या अभावी झी मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : स्पृहा जोशीचा युट्यूब चॅनल हॅक, माहिती देत अभिनेत्री म्हणाली, “आता सगळे व्हिडीओ…”

ही मालिका कधी बंद होईल आणि त्या जागी कोणता नवीन कार्यक्रम सुरू होईल हे अजून समोर आलेलं नाही. परंतु ही ऐतिहासिक मालिका बंद होणार असल्याने सोशल मीडियावरून या मालिकेचे प्रेक्षक त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshitish date and spruha joshi starrer lokmanya serial will be going off air soon rnv
Show comments