‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे आज गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख देखील मिळाली. हास्यजत्रा गाजवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच गौरवने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. येत्या काळात अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये झळकणार आहे. परंतु, उल्हासनगरचं बालपण ते लोकप्रिय अभिनेता हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. गौरवने नुकतीच राजश्री मराठीच्या ‘त्याची गोष्ट’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याने बालपण, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाविषयी भाष्य केलं.

गौरव मोरे म्हणाला, “आम्ही सगळ्यात आधी उल्हासनगरला स्टेशनच्या बाजूला ताडपत्री असलेल्या घरात राहायचो. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही विठ्ठलवाडी स्टेशनजवळ पुन्हा तसेच राहू लागलो. पण, माझी आई सांगते तसं तिकडच्या वातावरणाचा मला त्रास झाला म्हणून नंतर आम्ही कल्याणला राहायला आलो. त्याच दरम्यान माझ्या वडिलांची बदली भांडुपला झाली मग, त्यांनी फिल्टरपाड्यात राहण्यासाठी जागा पाहिली. तिथेही तसंच ताडपत्रीचं घर होतं. ताडपत्री म्हणजे ताडाच्या झाडाचं लाकूड वापरून ही घरं त्यावेळी बनवली जायची. पण, पाऊस पडला की खूप अडचण व्हायची. आमच्या घरचा एकजण पाणी साचू नये म्हणून घरात टोप लावून बसायचा.”

President Draupadi Murmu on Maharashtra tour
राष्ट्रपती मुर्मू आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच
Tanaji sawant Ajit Pawar
Tanaji Sawant : “शेतकरी तानाजी सावंतांना औकात दाखवतील”,’त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल; महायुतीत बिनसलं?
regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
sharad pawar group
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्यावरून शरद पवार गटाचं भाजपावर टीकास्र; म्हणाले,“राम मंदिर अन् संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या…”
Raj Thackeray, Raj Thackeray Wardha,
Raj Thackeray : “गत पाच वर्षांत या लोकांनी महाराष्ट्र नासवला,” राज ठाकरे असे का म्हणाले?
Solapur crime news
लातूरच्या अल्पवयीन मुलीस जन्मदात्या आईनेच विकून लग्न लावले, माढ्यातील धक्कादायक प्रकार

हेही वाचा : “पैशांसाठी काय काय करतात…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने नेटकऱ्यांना सुनावलं; म्हणाली, “ट्रोल करताना…”

गौरव पुढे म्हणाला, “सुरुवातीच्या काळात रंगाने सावळा आणि उंचीला बुटका असल्याने मला खूप दडपण यायचं. त्यानंतर शाळेत आठवीत गेल्यावर मी थोडा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागू लागलो. अनेकांच्या मिमिक्री करायचो…मग माझे मित्र झाले. मी एकदा लहानपणी शेजारी टीव्ही पाहण्यासाठी गेलो होतो पण, त्यांनी मला घराच्या बाहेर हाकललं. ही गोष्ट नेमकी माझ्या आईने पाहिली आणि ती म्हणाली, तू का गेलाय तिकडे? तिने मला यावरुन मारलं सुद्धा होतं. त्या काळात टीव्ही घेणं ही गोष्ट फार मोठी होती. तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य नसल्याने ४ ते ५ दिवस मी टीव्हीसाठी रडत होतो.”

हेही वाचा : रितेश विलासराव देशमुख : मुख्यमंत्री वडिलांचा सल्ला मानला अन् लातूरच्या हिरोने महाराष्ट्राला ‘वेड’ लावलं

“एक दिवस शाळेच्या मधल्या सुट्टीत बहिणीने मला आपल्या घरी टीव्ही आलाय असं सांगितलं. कधी ५.३० वाजतात आणि कधी घरी जातो असं मला झालेलं. कारण, तेव्हा मला टीव्हीचा रिमोर्ट हातात घ्यायची फार इच्छा होती. शाळेतून घरी गेल्यावर मी पहाटे ४ वाजेपर्यंत टीव्ही पाहत होतो. माझ्या सगळ्या मित्रांना आमच्याकडे टीव्ही आलाय असं मी सांगून ठेवलं होतं. आईला मी लहानपणी खूप घाबरायचो. तिची फक्त एकच इच्छा होती…याला वाईट संगत नको लागायला आणि आईच्या त्याच भीतीमुळे मी आजवर इथे पोहोचलो आहे. आता गेल्या दोन वर्षांपासून घरची परिस्थिती आधीपेक्षा खूप सुधारली आहे पण, मला त्या गोष्टीचा मी अजिबात माज करणार नाही. कारण, लहानपणी तुम्ही जे शिकता, जे तुमच्या मनात साचतं ते आयुष्यभर तसंच राहतं. आपले आई-बाबा मेहनत करतात ती परिस्थिती आपण सुधारायची हे मी आधीपासूनचं ठरवलं होतं.” असं गौरव मोरेने सांगितलं.