‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेचं नवं पर्व सुरू झालं आहे. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामुळे मालिकेतील बऱ्याच जुन्या कलाकारांनी निरोप घेतला असून नव्या कलाकारांची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली आहे. मालिकेत ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक झळकले आहेत. एका महत्त्वाच्या भूमिकेत गिरीश ओक ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या कालच्या भागात दिसले.

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यादरम्यान शाहरुख खानने रणवीरकडे दुर्लक्ष करत दीपिका पदुकोणला मारली मिठी? व्हिडीओ झाला व्हायरल

mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील शिर्के कुटुंबाचा अंत होऊन कालपासून (२० नोव्हेंबर) नव्या कथेला सुरुवात झाली आहे. मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. ज्यामध्ये गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात आली आहे. आता मालिकेत जयदीपचा अधिराज तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म झाला आहे. अधिराज हा रांगड्या शेतकऱ्याच्या रुपात झळकला आहे. तर गावंढळ गौरी सुशिक्षित नित्याच्या रुपात पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या कथानकाला दमदार सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – अभिनेत्री दीपाली पानसरे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत पुन्हा एकदा खलनायिकेच्या रुपात; पहिला लूक आला समोर

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नव्या रुपात झळकले आहेत. या मालिकेत त्यांची दमदार एन्ट्री झाली आहे. गिरीश ओक यांनी नित्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा – अमृता देशमुख-प्रसाद जवादेच्या लग्नात ‘या’ जोडीने वेधलं लक्ष, दोघांचे फोटो होतायत व्हायरल

हेही वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील ‘या’ अभिनेत्याची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री; झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

दरम्यान, गिरीश ओक यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ते ‘३८ कृष्ण व्हिला’, ‘काळी राणी’ या नाटकात काम करताना दिसत आहेत. रंगभूमीवर ही दोन्ही नाटक जोरदार सुरू आहेत.