अभिनेते अविनाश नारकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं विविध माध्यमातून मनोरंजन करत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते ‘झी मराठी’वरील ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘सन मराठी’वरील ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि विनोदी रील्स चांगल्या व्हायरल होतं आहेत. नुकताच त्यांनी एक रील शेअर केला आहे; ज्यामध्ये त्यांनी समस्त नवऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा – Video: ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील सार्थकने आनंदीसाठी घेतला खास उखाणा; म्हणाला, “वचन देतो…”

Jagan Mohan Reddy
Tirupati Laddu Row : “आधी धर्म सांगा मग तिरुपतीचं दर्शन घ्या”, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तिरुपती दर्शनाचा बेतच रद्द केला
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
MP supriya sule criticize deputy cm ajit pawar in pimpri chinchwad
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”
gulabrao patil on sanjay raut
Gulabrao Patil: “संजय राऊत अपना माल, अन् उद्धव ठाकरे…” गुलाबराव पाटलांची टोलेबाजी
Shivdeep Lande IPS officer from Bihar
Shivdeep Lande: शिवदीप लांडे राजीनामा दिल्यानंतर राजकारणात प्रवेश करणार? स्वतःच खुलासा करत म्हणाले…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

अभिनेते अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कधी फिटनेससंबंधित तर कधी मजेशीर रील शेअर करत असतात. पण काहीदा ते ट्रोल देखील होतात. पण या ट्रोलर्सना पत्नी ऐश्वर्या नारकर चोख प्रत्युत्तर देऊन तोंडं बंद करतात. अविनाश नारकर यांनी आता एक मजेशीर रील शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर ‘असा’ साजरा केला सिद्धार्थ जाधवचा वाढदिवस, अभिनेत्याचा संघर्ष ऐकून कलाकार झाले भावुक

या मजेशीर रीलमध्ये बायकोबरोबर भांडणं झाल्यानंतर समस्त नवऱ्यांनी काय करायचं? याचा सल्ला अविनाश नारकर यांनी दिला आहे. हा रील शेअर करत त्यांनी लिहीलं, “सेटवराचा टाईमपास… मज्जा…दिवाळी पाडवा जवळ आलाय… म्हणून तमाम नवरेमंडळींसाठी खास मोलाचा सल्ला…स्वसंरक्षण….अनुभवाचे बोल…”

हेही वाचा – आता ‘या’मध्येही मारली ‘ठरलं तर मग’ मालिकेने बाजी; ‘प्रेमाची गोष्ट’ला…

हेही वाचा – Video: ‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानने शुभांगी गोखलेंची केली नक्कल; पाहा व्हिडीओ

अविनाश नारकर यांच्या या मजेशीर रीलवर ऐश्वर्या नारकर यांनी प्रतिक्रियेत हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. तसेच एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “फक्त बघत राहील ना तर बायको अजून चिडते मग.. आता बोला की तोंड का बंद केले म्हणते.” तसेच दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं की, “छान भारी हं.” तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं की, “ईशय संपला…”

दरम्यान, याआधी अविनाश नारकर यांचा ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेतील एक डायलॉग चांगलाच व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते पालक आणि मुलांच्या संवादाविषयी बोलले होते. “ज्या घरात संवाद असतो, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये, त्या घरातली मुलं आपल्या मर्यादा आखून घेतात. ज्या घरातला संवादच तुटतो ते घर सुद्धा हळूहळू तुटायला लागतं,” असा अविनाश नारकर यांचा तो डायलॉग होता.