महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावरील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना आमंत्रित केले होते. मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या पतीसह वर्षावरील गणपतीचं दर्शन घेतले. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

हेमांगी कवीने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी विराजमान झालेल्या गणपतीची झलक दाखवली आहे. याला कॅप्शन देताना तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : “यावर्षीचे देखावे…” पुण्यातील गणपती दर्शनानंतर प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या “तो योग आज…”

jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Jayant Patil On Supriya Sule Sharad Pawar
Jayant Patil : सुप्रिया सुळे की जयंत पाटील? शरद पवारांच्या मनात मुख्यमंत्री कोण? जयंत पाटील म्हणाले, “त्यांचा निर्णय…”
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
Yavatmal, Badlapur incident, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis, women's safety, Shakti Act, severe punishment, public sentiment, Maharashtra politics
बदलापूर घटनेवर अजित पवारांची तिखट प्रतिक्रिया…म्हणाले, तो जो आरोपी आहे त्याचे….
PM Thailand, Paetongtarn Shinawatra,
विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?
Ravikant Tupkar, Eknath Shinde,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..

हेमांगी कवीची पोस्ट

“जेव्हा थेट ‘वर्षा’ वरून बोलावणं येतं! महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शन आणि आशीर्वादासाठी आमंत्रित करून मान दिल्याबद्दल खरंच खुप खुप आभार. वर्षा बंगल्यात त्यांच्याबरोबर बाप्पाची केलेली आरती हा एक आल्हाददायक अनुभव होता जो कायम स्मरणात राहील!

एवढंच नाही तर सौ. लताताईं, वृषाली वहिनी आणि त्यांची मंडळी अगदी घरच्यांप्रमाणे प्रेमाने आमच्या पाहुणचाराची विचारपूस करत होते. असं वाटलं जणू आपल्या जवळच्या नातेवाईकाकडेच सणाला आलो आहोत! कसलीच औपचारिक्ता नाही. आता Security reasons मुळे काही गोष्टी नाही share करू शकत पण बंगल्यात शिरताना मनात जी भीती किंवा दडपण होतं ते आत गेल्यानंतर एकदम नाहीसं झालं! @mangeshdesaiofficial तुझ्यामुळे हे शक्य झालं त्याबद्दल तुला अनेक धन्यवाद. यानिमित्ताने कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय असलेला आणि बाहेरून पाहत आलेलो ‘वर्षा’ आतून पाहण्याची ईच्छा पुर्ण झाली!

खरं सांगायचं तर त्या वास्तूबद्दलचं असलेलं आकर्षण पुढच्या अर्ध्या तासात संपून त्यात राहणाऱ्या व्यक्तीवर केवढी मोठ्ठी जबाबदारी आहे या जाणिवेने आदर वाढायला लागतो! घरात गणपती आहेत म्हणून जरा निवांत असतील मुख्यमंत्री तर छे! पाहुण्यामंडळींमधून त्यांच्या नकळत वेळ काढून मध्ये मध्ये आत जाऊन कामकाज करणं, कसल्याशा Files वर त्यांच्या कर्मचाऱ्यांना सह्या देणं एकीकडे चालूच होतं. मी जरा दबकतच माझ्या ओळखीच्या व्यक्तीला विचारलं “गणपतीच्या एवढ्या सगळ्या गडबडीत आणि तेही एवढ्या late कसल्या सह्या चालंल्यात? तर म्हणाला “उद्याच्या सार्वजनिक सुट्टीबद्दल असू शकतं काहीतरी.” मी पुढे म्हटलं “राज्याच्या कारभारासोबत गेल्या दहा दिवसांतला गोतावळा सांभाळायचा, लाखो लोकांना personally भेटायचं, त्यांचं स्वागत करायचं, विचारपुस करायची, बरं तिथं गेलेल्या प्रत्येकाला वाटतं त्यांच्या बरोबर photo हवाच त्यासाठी कुणालाही नाराज न करता, protocols सांभाळत लाखो photos साठी उभं राहयचं. उत्सहाच्या भरात मी पण त्यांना photo साठी विचारल्याचं आठवलं, लाज वाटली आणि त्यांच्याबद्दल वाईट ही वाटलं! म्हटलं “अशाने यांना थकायला होत नसेल का?” तर तो म्हणाला “इथं असंच काम चालतं! आपल्या ठाण्यातसुद्धा आधी असंच काम करायचे की! न थांबता, अविरत!”

मी मनात म्हटलं “गणपती बाप्पा यांना एक माणूस म्हणून शक्ती देओ आणि मुख्यमंत्री म्हणून यांच्या हातून महाराष्ट्राचं, आम्हां नागरिकांचं अधिक कल्याण घडो!” खरंच राजकारण, समाजकारण! सोप्पं नाही गड्या!”, असे कॅप्शन हेमांगी कवीने दिले आहे.

दरम्यान हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी यावर हार्ट, हात जोडताना आणि टाळ्या वाजवतानाचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी गणपती बाप्पा मोरया असं म्हटलं आहे.