Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : आज देशाचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. छत्रपती शिवरायांची ही ३९५वी जयंती आहे. त्यामुळे एखाद्या सणाप्रमाणे ‘शिवजयंती’ साजरी केली जात आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. मराठी कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शिवजयंती’च्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. सुबोध भावे, स्वप्नील जोशी, प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, अश्विनी महांगडे, पृथ्वीक प्रताप, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव अशा अनेक कलाकारांनी ‘शिवजयंती’निमित्ताने खास पोस्ट शेअर केल्या आहेत. नुकतीच अभिनेत्री, लेखिका नेहा शितोळेने ( Neha Shitole ) पोस्ट लिहिली आहे; ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या नेहा शितोळेने ( Neha Shitole ) ‘शिवजयंती’निमित्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून नेहाने स्वतःचं परखड मत मांडलं आहे आणि शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली आहे.

नेहा शितोळेने ( Neha Shitole ) लिहिलं आहे, “एरवी समाजाला पोषक आणि उपयुक्त अशी एकही कौतुकास्पद गोष्ट हातून न घडलेल्या पण आज फेटे बांधून, नऊवारी साडी नेसून, लायकी नसनाताही कपाळावर चंद्रकोर मिरवत आणि छत्रपतींचा वारसा ( ओरडत, ओरबाडत ) नुसत्या घोषणा देत, गाडीचे आणि हॉनचे कर्कश्य आवाज करत, मध्यरात्री नंग्या तलवारी रस्त्यावरून घासत ठिणग्या उडवून त्यांची आणि महाराजांच्या कीर्तीची धार बोथट करणाऱ्या सर्व आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी लाभो हीच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना…”

नेहा शितोळे इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, गेल्या वर्षीदेखील नेहा शितोळे ( Neha Shitole ) ‘शिवजयंती’निमित्ताने लिहिलेली खास पोस्ट खूप व्हायरल झाली होती. त्यावेळी तिने महाराजांवर गाणं लिहिण्याची संधी दिल्याबद्ल तिने महेश मांजरेकर यांचे आभार मानले होते. नेहा शितोळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये काम केलं आहे. मराठीसह हिंदीतही तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात नेहाने खिलाडूवृत्ती अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे ती अजून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.