छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ मुळे अभिनेते मिलिंद गवळी घराघरांत लोकप्रिय झाले. या मालिकेत त्यांनी अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ते नेहमीच विविध विषयांवर आपलं मत मांडत असतात. नुकतेच ते त्यांच्या श्वानाबरोबर लोहगडावर गेले होते. या ट्रेकिंगचा सुंदर व्हिडीओ मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

मिलिंद गवळी यांनी शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत खास मुंबई-पुण्यापासून जवळ असणाऱ्या लोहगडाला भेट दिली. लोहगडावर ट्रेक करताना त्यांच्या मनात विविध विचार येऊ लागले. आपले हे विचार त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. लोहगडाच्या ट्रेकचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. अभिनेते या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणत आहेत जाणून घेऊया…

What Rahul Solapurkar Said?
Rohit Pawar : “राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानामागे कुणाचा सडका मेंदू?” रोहित पवार यांचा सवाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप

हेही वाचा : “सडेतोड बोलणारा आणि वागणारा हा माणूस…”, मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेबद्दल किरण मानेंची पोस्ट; म्हणाले…

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“लोहगड”
परवा हा गड चढायचा योग आला
खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं. उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते. काही लोक थांबत थांबत चढतात, तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो. ते एका दमात गड चढायचा प्रयत्न करतात. दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत.

एकदा का आपण गडावर पोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते. माझ्याबरोबर “ Zen “आमचा कुत्रा होता. तो एका दमात वरती धावत सुटला. त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला. असं वाटलं की, आपल्यामध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी. वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते. ते विचार असे होते की, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवता जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल. तसेच महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील.

जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली, एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत,
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड. या सगळ्या गडांवर/ किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीचा नवीन लूक चर्चेत, अभिनेत्रीचा नवा हेअर कट पाहून सुकन्या मोनेंची खास कमेंट…

दरम्यान, मिलिंद गवळींच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत झळकत आहेत. अरुंधती आणि देशमुख कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या अनिरुद्ध देशमुखची व्यक्तिरेखा ते साकारत आहेत. रंजक कथानकामुळे ही मालिका नेहमीच टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या टॉप ५ मध्ये असते.

Story img Loader