‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा २३ डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करताना दिसत आहे.

अभिनेता कश्यप परुळेकरने काल मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसांचा व्हिडीओ शेअर केला होता. “‘नवा गडी नवं राज्य’ अध्याय समाप्त…कळावे, लोभ असावा…” असं कॅप्शन लिहीत कश्यपने शूटिंगच्या शेवटचा दिवसांचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नाराजी व्यक्त केली आहे.

Paani Movie on the Water Crisis
Paani Movie Review : पाणी संघर्षाला प्रेमाचा ओलावा
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Loksatta aaptibaar Raj Thackeray Statement on Assembly Elections 2024 winning
आपटीबार: राजसत्तेचे चित्र
Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
Shivsena challenge to Rajesh Tope, Rajesh Tope news,
राजेश टोपे यांना शिवसेनेचे आव्हान
Maratha reservation high court
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार
Uddhav Thackerays next challenge is not the third aghadi but the challenge of strike rate
उद्धव ठाकरेंपुढे तिसऱ्या आघाडीचं नव्हे, ‘स्ट्राइक रेट’चं आव्हान…
former cricketer Wasim Jaffer
रणजीपाठोपाठ इराणी जेतेपदाने मुंबईचे वर्चस्व अधोरेखित! १९९७च्या विजेत्या संघातील सदस्य वसिम जाफरचे मत

हेही वाचा – Premachi Goshta: मुक्ता सागरच्या लग्नाचं सत्य कळताच सावनी भर कार्यक्रमात करणार गौप्यस्फोट

कश्यपच्या व्हिडीओवर ‘मालिका बंद करू नका’, ‘मालिकेचा दुसरा भाग लवकर आणा’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकरीने लिहिलं आहे, “पण का? अर्धवट मालिका आहे. बंद करू नका.” तसंच दुसऱ्या नेटकरीने लिहिलं, “तुम्ही नवीन मालिका सुरू करा प्लीज.” तसेच तिसऱ्या नेटकरीने लिहिलं, “काय यार…मालिका खूप छान आहे. बंद नका करू.” अशा अनेक प्रतिक्रिया कश्यपच्या व्हिडीओवर प्रेक्षकांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: संगीत सोहळ्यातील इंद्रा-जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहून मुक्ता-सागरमध्ये होणार वाद, नेमकं काय घडणार? वाचा…

दरम्यान, श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ‘ब्लॅक कॉफी प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाली होती. अभिनेत्री पल्लवी पाटील, अनिता दाते-केळकर, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. रमाचा संसार सांभाळणारी आनंदी घराघरात पोहोचली. रमा-राघवच्या संसारात आलेला हा नवा गडी म्हणजेच आनंदीचं काही काळाने नवं राज्य पाहायला मिळालं. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आणि अधिराज्य करू लागली. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. २३ डिसेंबरला ‘नवा गडी नवं राज्य’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.