‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना १० वर्षं खळखळून हसवलं. गेल्या महिन्यात या कॉमेडी शोने चाहत्यांचा निरोप घेतला. हा विनोदी कार्यक्रम बंद होण्यामागे अनेक कारणं होती. या कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक निलेश साबळेने ती कारणं अनेकदा माध्यमांसमोर मांडली आहेत. परंतु, गेल्याच महिन्यात बंद झालेला हा कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निलेश साबळे यानं एका मुलाखतीत त्याबाबतचा खुलासा केला आहे.

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा निलेश साबळेला सागर कारंडेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा निलेश म्हणाला, “जेव्हा हवा येऊ द्या सुरू होतं, तेव्हा सागर बाहेर पडला; त्याची वेगळी कारणं होती. सागरला बाहेर पडून दोन वर्षं झाली. तो स्वत:हून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो नाटक करत होता. जेवढं मला माहीत आहे, त्यानुसार अजूनही त्याची दोन नाटकं चालू आहेत आणि आता सध्या तो सिनेमा करतोय.”

Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
Rape of minor girls in Vasai and Nalasopara
Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या दोन घटना; सावत्र पिता आणि काकांकडून बलात्कार
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
Girls Found Hanging in uttar pradesh
Crime News : धक्कादायक! जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी गेल्या अन् दुसऱ्या दिवशी झाडावर आढळले मृतदेह, दोन मुलींच्या मृत्यूमुळे खळबळ

हेही वाचा… स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”

निलेश पुढे म्हणाला, “चला हवा येऊ द्या अजूनही बंद नाही झालेलं. ‘झी’कडे जी उरलेली टीम आहे, त्या सगळ्यांना घेऊन, कदाचित ‘चला हवा येऊ द्या’ हे येऊही शकतं. त्या टीममध्ये तुम्हाला सागर कारंडे निश्चित दिसेल.”

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, स्नेहल शिदम, अंकुर वाढवे असे तगडे हास्यसम्राट होते. हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर कुशलने हिंदी कॉमेडी शोची वाट धरली. ‘मॅडनेस मचायेंगे’ या हिंदी भाषिक विनोदी कार्यक्रमात कुशलने एन्ट्री मारलीय. कुशलबरोबर या कार्यक्रमात मराठमोळी हेमांगी कवीदेखील सामील झालीय.

हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

तर निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम व सुपर्णा श्याम हे कलाकार नव्यानं प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. कलर्स मराठी या वाहिनीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या विनोदी कार्यक्रमात या कलाकारांनी प्रेक्षकांच मनोरंजन करायला सुरुवात केलीय.