‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. त्यामुळे मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीमध्येही अव्वल स्थानावर आहे. नवनवीन ट्वीस्टमुळे प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवण्यात मालिकेला यश आलं आहे. अशातच अर्जुनची एक भुवई वर असण्यामागच्या कारणाचा खुलासा झाला आहे. हा खुलासा अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा – Rahul Vaidya And Disha Parmar: राहुल वैद्यच्या मुलीची पहिली झलक समोर; बहिणीने केला फोटो शेअर

Nilesh Sable Entry in Bigg Boss Marathi Season 5 House Watch Video
Video: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निलेश साबळेची एन्ट्री, खुमासदारपणे विचारलेले तिखट प्रश्न ऐकून सदस्यांच्या चेहऱ्यावरचा उडाला रंग
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar Mother and wife overwhelmed for this action
Video: धनंजय पोवारची ‘ती’ कृती पाहून भारावल्या आई…
Bigg Boss Marathi 5 grand finale on 6 october
Video: Bigg Boss Marathi 5 चा ग्रँड फिनाले अवघ्या १५ दिवसांवर? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…
Bigg Boss Marathi 5 aarya jadhao praised suraj chavan
Bigg Boss Marathi तील सर्वात खरा स्पर्धक कोण? आर्या जाधव ‘या’ सदस्याचे नाव घेत म्हणाली, “शोच्या सुरुवातीपासून…”
Bigg Boss Marathi Season 5 Kapil Honrao Appreciated to arbaz and question to pandharinath and Ankita
“प्रचंड हुशारीने गेम खेळतोय”, अरबाजचं कौतुक करत मराठी अभिनेत्याचा पंढरीनाथ, अंकिता आणि डीपीला सवाल, म्हणाला, “असा गेम…”
Bigg Boss Marathi 5 Press Conference promo
Video: अरबाज पटेलबद्दल ‘तो’ प्रश्न अन् निक्कीचा चेहराच पडला, बिग बॉसच्या घरात झाली पत्रकार परिषद
bigg boss marathi varsha usgoanker left b team and make strategy with nikki
५३ दिवसांनी वर्षा उसगांवकरांनी गेम बदलला! निक्कीशी हातमिळवणी करत ‘टीम B’मधून एक्झिट, नेटकरी म्हणाले…
bigg boss marathi arbaz patel second time captain of the house
Bigg Boss Marathi : अरबाज पटेल दुसऱ्यांदा झाला कॅप्टन! पहिल्याच फेरीत निक्कीने बाजी पालटली अन्…; नेमकं काय घडलं? वाचा
Aarya Jadhao choose top 5 of Bigg Boss Marathi 5
तुझ्यासाठी Bigg Boss Marathi तील टॉप ५ सदस्य कोण? आर्या जाधवने घेतली फक्त ‘ही’ चार नावं, म्हणाली…

अलीकडेच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री निर्मिती सावंत आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळत आहेत. यावेळी निर्मिती सावंत अर्जुनची एक भुवई वर असण्यामागचं रहस्य सांगताना दिसत आहेत. निर्मिती सावंत म्हणतात की, “अर्जुन एकदा नदीत पोहायला गेला होता. तिथे एक माणूस मासे पकडायला गळ टाकून बसला होता. अर्जुन पोहत पोहत त्या माणसाच्या जवळ गेला आणि तो गळ त्याच्या भुवईत अडकला. तेव्हापासून त्याची एक भुवई वर आहे.” निर्मिती सावंत यांच्या या मजेशीर रहस्यानंतर सर्व कलाकार मंडळी हसताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या संगीत सोहळ्यातला व्हिडीओ व्हायरल; नवराज हंसच्या गाण्यावर पाहुण्यांचा जबरदस्त डान्स

हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? करायची मॅकडोनाल्डमध्ये काम

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीची जवळीक वाढताना दिसत आहे. अर्जुनला सायली आवडू लागली आहे. पण दुसऱ्याबाजूला टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर असलेली या मालिकेची जागा तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेनं घेतली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे, तर ‘ठरलं तर मग’ दुसऱ्या स्थानावर आली आहे.