‘झी मराठी’वर नुकत्याच सुरू झालेल्या ‘पारु’ या मालिकेत अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या गाजलेल्या मालिकेमुळे अभिनेता घराघरांत लोकप्रिय झाला. पुढे, त्याने ‘बिग बॉस’मराठीमध्ये सहभाग घेतला होता. छोट्या पडद्यावर यश मिळाल्यावर वैयक्तिक आयुष्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रसादने अमृता देशमुखशी लग्नगाठ बांधली.

प्रसाद आणि अमृताची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लग्नानंतर दोघांनीही आता पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. प्रसाद ‘पारु’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून, अमृता सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसत आहे. गेली वर्षभर प्रसादने स्वत:वर भरपूर मेहनत घेतली. त्याने जवळपास २८ किलो वजन कमी केलं. टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना अभिनेत्याने याबद्दल खुलासा केला आहे.

kalyan girl cheated for 10 lakhs
कल्याणमधील तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून १० लाखाला फसवले
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
kedar Dighe on Anand Dighe
Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”
Young Man Abuses Girlfriend on Street
तुम्ही याला प्रेम म्हणता का? भररस्त्यात प्रेयसीबरोबर तरुणानं केलं असं काही की…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची?
Ruby Prajapati daughter of auto driver passed neet ug medical exam
स्वप्नपूर्ती! ऑटो ड्रायव्हरची मुलगी होणार डॉक्टर; हलाखीच्या परिस्थितीत NEET-UG परीक्षा उत्तीर्ण, वाचा रुबी प्रजापतीचा प्रेरणादायी प्रवास
Mahalakshmi Murder Case
Mahalakshmi Murder Case : महालक्ष्मीची हत्या का केली? आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वी काय सांगितलं होतं? मुक्तीरंजन रायच्या आईचा धक्कादायक खुलासा
MP supriya sule criticize deputy cm ajit pawar in pimpri chinchwad
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”
Sankarshan Karhade niyam v ati lagoo drama Housefull in Qatar
संकर्षण कऱ्हाडेच्या नाटकाला कतारमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, अनुभव सांगत म्हणाला, “परभणीच्या काद्राबादमध्ये राहायचो तेव्हा…”

हेही वाचा : Video : “शरद पवारांच्या वयात स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची…”, किरण मानेंची सत्ताधाऱ्यांवर टीका; म्हणाले…

प्रसाद म्हणाला, “एक वर्षाआधी माझं वेळापत्रक निश्चित नव्हतं. मी हवं तसं वागायचो. पण, कालातरांने ही जीवनशैली चुकीची असल्याची जाणीव मला झाली. वेळेत खाणं, झोपणं आणि व्यायाम करणं ही सगळी शिस्त मी स्वत:ला लावली. माझ्या शरीरात हळुहळू बदल जाणवू लागला. या सगळ्याचा फायदा मी सध्या साकारत असलेल्या आदित्य किर्लोस्करच्या भूमिकेसाठी मला झाला.”

प्रसाद पुढे म्हणाला, “मला जीमला रोज जाता येत नाही. त्यामुळे मी घरी व्यायाम करतो. यासाठी ट्रेनर मला ऑनलाइन मदत करतो. अर्धा-पाऊण तास वेळ मिळाला, तर मी आवर्जून धावायला जातो. प्राणायाम करतो…आठवड्यातून चार दिवस तरी हे वेळापत्रक मी काटाक्षाने पाळतो यामुळे माझं २८ किलो वजन कमी झालं आहे.”

हेही वाचा : रिहानाने प्री-वेडिंग सोहळ्यात बोलताना चुकवलं अंबानींच्या सूनबाईंचं नाव; राधिकाऐवजी म्हटलं…, तुम्हीच पाहा Video

“मी आता रोज ४ लिटर तरी पाणी पितो. पाण्यासाठी माझी दोन लिटरची खास बॉटल आहे. वरण-भात, भाजी, पोळी असा संपूर्ण आहार मी घेतो. या सगळ्यात गोड खाण्यावर माझं नियंत्रण असतं. तुम्हाला फिट राहायचं असेल आणि वेळ मिळत नसेल तर, दिवसातून एकदा तरी चालायला जा. यामुळे शरीरातील अनेक व्याधी दूर होतात. या सगळ्या मेहनतीचं फळ मला आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारताना मिळालं. पहिल्याच प्रोमोमध्ये मी फिट दिसत होतो त्यामुळे मलाही तो प्रोमो पाहून आनंद झाला.” असं प्रसादने सांगितलं.