Bigg Boss च्या शोमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. आता बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेला आणि टॉप २ पर्यंत मजल मारणारा पुष्कर जोग(Pushkar Jog) सध्या चर्चांचा भाग बनलेला आहे. पुष्करने बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील अनेक स्पर्धकांच्या खेळावर सोशल मीडियावर वक्तव्य केल्याने तो मोठ्या चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. आता त्याने एका मुलाखतीत त्याच्या सीझनमध्ये त्याचे आवडते कोणते सदस्य होते, यावर भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला पुष्कर जोग?

‘एंडेमोल शाइन इंडिया’ला पुष्कर जोगने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला पहिल्या पर्वात सहभागी झालेले कोणते सदस्य आवडत होते? असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्याने म्हटले, “ऋतुजा धर्माधिकारी माझी आवडती सदस्य होती. विजेती झालेली मेघा धाडे, सई, रेशम आणि आऊ हे सदस्य माझे आवडते आहेत. आऊ माझ्या आईसारखी आहे.” असे म्हटले.

जेव्हा बिग बॉसने घोषणा करत सांगितले की तू आणि मेघा धाडे बिग बॉस मराठी सीझनचे टॉप २ सदस्य आहात, त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या? यावर पुष्करने म्हटले, “मी फार भावुक झालो होतो. ते सगळं मी माझ्या आई-वडिलांसाठी केलं. मी २३ वर्षांचा असताना माझ वडिलांचे निधन झाले. मी माझ्या वडिलांच्या फार जवळ होते. वडिलानंतर आयुष्य फार अवघड होतं. मी जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत होतो, त्यावेळी कुठेतरी मागे गेल्यासारखे वाटत होते. मला वाटत होते की हे माझे घर आहे. मी लोकांची हृदय जिंकली असं म्हणायला मला आवडेल.” असे पुष्करने म्हटले आहे.

हेही वाचा: दोन दिवसांत अभिजीत सावंत बदलला…; मित्रमंडळींचा मोठा आरोप! निक्कीशी मैत्री पडली भारी, नेमकं काय घडलं?

याबरोबरच, पुष्करने बिग बॉसच्या शोने मला खूप काही दिले आहे. माझे संपूर्ण आयुष्य बदलले. माझ्या करिअरमध्ये प्रगती झाली. असे म्हणत पुष्करने बिग बॉसचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. अनेकदा त्याने इतर सदस्यांबरोबर चूकीच्या पद्धतीने वागल्याने निक्की तांबोळीवर टीका केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. आता पाचव्या पर्वात बिग बॉसच्या घरात नवीन कोणता कल्ला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाला पुष्कर जोग?

‘एंडेमोल शाइन इंडिया’ला पुष्कर जोगने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला पहिल्या पर्वात सहभागी झालेले कोणते सदस्य आवडत होते? असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना त्याने म्हटले, “ऋतुजा धर्माधिकारी माझी आवडती सदस्य होती. विजेती झालेली मेघा धाडे, सई, रेशम आणि आऊ हे सदस्य माझे आवडते आहेत. आऊ माझ्या आईसारखी आहे.” असे म्हटले.

जेव्हा बिग बॉसने घोषणा करत सांगितले की तू आणि मेघा धाडे बिग बॉस मराठी सीझनचे टॉप २ सदस्य आहात, त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या? यावर पुष्करने म्हटले, “मी फार भावुक झालो होतो. ते सगळं मी माझ्या आई-वडिलांसाठी केलं. मी २३ वर्षांचा असताना माझ वडिलांचे निधन झाले. मी माझ्या वडिलांच्या फार जवळ होते. वडिलानंतर आयुष्य फार अवघड होतं. मी जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत होतो, त्यावेळी कुठेतरी मागे गेल्यासारखे वाटत होते. मला वाटत होते की हे माझे घर आहे. मी लोकांची हृदय जिंकली असं म्हणायला मला आवडेल.” असे पुष्करने म्हटले आहे.

हेही वाचा: दोन दिवसांत अभिजीत सावंत बदलला…; मित्रमंडळींचा मोठा आरोप! निक्कीशी मैत्री पडली भारी, नेमकं काय घडलं?

याबरोबरच, पुष्करने बिग बॉसच्या शोने मला खूप काही दिले आहे. माझे संपूर्ण आयुष्य बदलले. माझ्या करिअरमध्ये प्रगती झाली. असे म्हणत पुष्करने बिग बॉसचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पुष्कर जोग बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील सदस्यांच्या खेळावर सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. अनेकदा त्याने इतर सदस्यांबरोबर चूकीच्या पद्धतीने वागल्याने निक्की तांबोळीवर टीका केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. आता पाचव्या पर्वात बिग बॉसच्या घरात नवीन कोणता कल्ला होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.