गेल्या काही दिवसांपासून ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री आणि भगरे गुरुचींची कन्या अनघा अतुल हिच्या नव्या हॉटेलची जोरदार चर्चा आहे. ‘वदनी कवळ’ असं या हॉटेलच नाव असून पुण्यातील डेक्कन परिसरात १९ ऑक्टोबरला हे हॉटेल सुरू करण्यात आलं. अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे या दोघांनी मिळून या हॉटेलची जबाबदारी घेतली आहे.

अनघाच्या या नव्या हॉटेलमध्ये अनेक मराठी कलाकार जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. ‘वदनी कवळ’ हे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. त्यामुळे खवय्ये येथे शुद्ध शाकाहारी अशा पारंपरिक थाळीचा आस्वाद घेत आहेत. अशातच अनघाने यापूर्वी सुरू केलेल्या पहिल्या हॉटेलविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितलं. या हॉटेलमुळे अनघासह तिच्या कुटुंबीयांचं मोठ आर्थिक नुकसान झालं होतं.

Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Teacher Dies of Heart Attack After Getting Fake Call
Crime News : “तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये…” फेक फोन कॉलमुळे मुलीच्या आईचा मृत्यू; कुठे घडली घटना?
friends
वेड्या दोस्तीतील शहाणीव…
Success Story Of Ajay Tewari
Success Story : मर्चंट नेव्ही ऑफिसर ते उद्योजक; वाचा आयटी व्यवसायातील सल्ले देणाऱ्या अजय तिवारी यांची गोष्ट
Ashka goradia
Aashka Goradia : टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्रीने उभारला ८०० कोटींचा व्यवसाय, ट्रोल झाल्यामुळे सोडली होती सिनेइंडस्ट्री!
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
Sahil Singh's Inspirational Journey
Success Story: शाब्बास पोरा! लहान वयात घरची जबाबदारी; रस्त्याकडेला पर्सविक्रीपासून प्रोफेशनल फॅशन मॉडेलपर्यंतचा प्रवास; साहिल सिंगचा प्रेरणादायी प्रवास

हेही वाचा – Video: ‘टायगर ३’ चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ लीक; सलमान खानला वाचवण्यासाठी बादशाहची खतरनाक एन्ट्री

‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलला अनघा अतुलने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने हॉटेल व्यवसायातील अनुभव सांगितला. तसंच तिने पहिल्या हॉटेलचा किस्सा सुद्धा सांगितला. अनघा म्हणाली, “हे मी अजूनपर्यंत कुठे बोलली नाही. पण २०२०मध्ये ‘वदनी कवळ’ सुरू केलं होतं. १५ मार्च २०२० रोजी बाणेरमध्ये पहिलं हॉटेल सुरू केलं होतं. पूजा वगैरे सगळं झालं. तेव्हा बाणेरमधील चांगल्या परिसरात दोन मजली हॉटेल होतं. खूप खर्च केला होता. त्यावेळेस पंजाबी थाळी, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन थाळी असं सगळं ठेवण्यात आलं होतं. हॉटेल १५ मार्चला सुरू केल्यानंतर २० मार्चला लॉकडाऊन झालं. त्यामुळे आम्हाला ही बाजू एक्स्प्लोर करताच आली नाही. लोकांना सर्व्ह करता आलं नाही.”

हेही वाचा – दिवाळी पार्टीसाठी जान्हवी कपूरचा खास ग्लॅमरस लूक; रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीने वेधलं लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

पुढे अनघा म्हणाली, “हा एक लॉकडाऊन नाही तर लागोपाठ तीन लॉकडाऊन झाले. म्हणून वर्षभरात हे हॉटेल बंद करावं लागलं. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला. आम्ही त्यातून रिकव्हर होताना खूप विचार केला. हॉटेल विकण्याचा देखील विचार केला होता. पण कुठेतरी वाटतं होतं की, आपण ज्या व्यवसायात अनुभवच घेतला नाही. तर आपण त्यातून माघार कशी घेऊ शकतो? अखिलेशच्या डोक्यात आलं की, जे सामान आहे, ते वाया घालवायचं नाही. त्याच्या मदतीने आपण काहीतरी करून या. कारण ते आपलं आहे. मग तिथून या हॉटेलसाठी सुरुवात झाली. या जागेवर आम्हाला जास्त खर्च करावा लागला नाही.”