स्टार वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत प्रेक्षकांना लवकरच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. यामधील खलनायिका शालिनी गौरी-जयदीपच्या प्रेमाचा शेवट करून त्यांचं आयुष्य संपवणार असल्याचा प्रोमो मध्यंतरी प्रसिद्ध करण्यात आला होता. यानंतर अनेकांनी आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका संपणार असा अंदाज वर्तवला होता. परंतु, लवकरच या मालिकेत गौरी-जयदीपच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू होणार आहे. मालिकेत जवळपास २५ वर्षांचा लीप आला असून आता प्रत्येकाचं आयुष्य पुढे सरकलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येत्या काही दिवसांमध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकलं असून गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. अर्थात गौरी नित्या, तर जयदीप अधिराजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नित्या-अधिराजची प्रेमकहाणी कशी फुलणार? कोणती नवी पात्र असणार? याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे.

The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
woman arrested from mp for stealing valuable watch from actress house
अभिनेत्रीच्या घरी चोरी करणाऱ्या महिलेला मध्यप्रदेशातून अटक
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या
Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
Mahima Chaudhry met Hina Khan during her cancer treatment
कर्करोगावर मात करणाऱ्या महिमा चौधरीने हिना खानची घेतली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली….

हेही वाचा : ‘देऊळ’मधील ‘त्या’ संवादाची आठवण काढणाऱ्या चाहत्याची हृषिकेश जोशींनी घेतली दखल; म्हणाले, “यांना दंडवत…”

२५ वर्षांच्या लीपनंतर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत ‘रंग माझा वेगळा’ फेम सौंदर्या अर्थात अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची एन्ट्री होणार आहे. त्या मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत दिसतील. ‘वसुंधरादेवी अहिरराव’ असं त्यांच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आणि हटके असेल.

हर्षदा खानविलकर याविषयी म्हणाल्या, “‘स्टार प्रवाह वाहिनीने माझ्यावर विश्वास ठेऊन नेहमीच नवनव्या भूमिकांसाठी माझी निवड केली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत मी साकारत असलेली वसुंधरादेवी ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्यांच्या पेहरावाची नेहमीच प्रशंसा झालीये. भरजरी साड्या, दागिने ही माझ्या भूमिकेची प्रमुख ओळख बनली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र, मी आता साकारत असलेली वसुंधरादेवी हे पात्र याच्या पूर्ण वेगळं आहे. वसुंधरादेवीचा गावात दबदबा आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे मी आत्मसात केलेली कोल्हापुरी भाषा. कोल्हापूरवर माझं विशेष प्रेम आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम वसुंधरादेवींनाही मिळेल याची खात्री आहे.”

harshada
हर्षदा खानविलकर

हेही वाचा : “तू कधीच पत्नीचं कौतुक करत नाहीस,” गश्मीर महाजनी चाहत्याला उत्तर देत म्हणाला, “खूप कमी लोक…”

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका नव्या रुपात प्रेक्षकांना येत्या २० नोव्हेंबरपासून पाहायला मिळणार आहे. ही मालिका रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.