दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (Friendship Day) साजरा केला जातो. रक्ताचं नातं नसलं तरी मैत्री हे नातं खूप सुंदर असतं. याचं नात्याचा आज खास दिवस जगभरात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं कलाकार मंडळीही त्यांच्या खास जीवलग मित्र-मैत्रिणीविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. तसेच त्यांच्या मैत्री विषयी गमतीशीर किस्से सांगत आहे.

नुकताच ‘स्टार प्रवाह’ या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ‘रंग माझा वेगळा’ फेम दिपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि ‘स्वाभिमान’ फेम पल्लवी म्हणजे पूजा बिरारी या दोघी आपल्या मैत्रीविषयी सांगताना दिसत आहेत. यावेळी रेश्मा व पूजाला विचारलं जात की, ‘तुमची कोणत्या विषयावर भांडणं होतात?’ यावर पूजा म्हणते की, “आम्ही नेहमी त्या एका गोष्टीवरूनच भांडत असू ती म्हणजे वेळ. तिचं (रेश्मा) म्हणणं असतं, तू मला वेळच देत नाही. तू मला भेटतंच नाही आणि मी तशीच आहे.”

mumbai, Leakage in New MHADA Homes in Vikhroli, Leakage in new mhada houses in vikhroli, New MHADA Homes in Vikhroli, Winners Demand Immediate Repairs and Accountability, vikhroli news, mumbai news,
म्हाडाच्या विक्रोळीतील नव्या कोऱ्या घरांमध्ये गळती, बांधकामावर प्रश्नचिन्ह
pets concerns Are we loving our pets to death
पाळीव प्राणी विसरत चाललेत स्वत:चं नैसर्गिक वागणं; काय आहेत त्यामागची कारणं?
There should be communication between parents and children Dr Harish Shetty
पालक आणि मुलांमध्ये संवाद असावा-डॉ. हरिश शेट्टी
mht cet result date latest marathi news
एमएचटी-सीईटीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार…जाहीर झाली तारीख आणि वेळ…
ankita srivastava
‘वर्ल्ड ट्रान्स्प्लांट गेम’मध्ये भारताचा ठसा उमटविणारी अंकिता श्रीवास्तव…
Challenges facing India Aghadi politics bjp
लेख: इंडिया आघाडीसमोरील आव्हाने
Man touched a woman in a crowded DTC bus
गर्दीचा फायदा घेत बसमध्ये महिलेला नको त्या जागी स्पर्श; महिलेने इशारा दिल्यानंतरही त्याने…तरुणाचा संतापजनक VIDEO व्हायरल
Kanyakumari New Resolution Through Spiritual Sadhana Narendra Modi Opinion
कन्याकुमारीतील साधनेतून नवे संकल्प आकाराला…

हेही वाचा – मिरा जगन्नाथनं सोडली ‘ठरलं तर मग’ मालिका; आता साक्षीच्या भूमिकेत दिसली ‘ही’ अभिनेत्री

हे ऐकून पुढे रेश्मा म्हणते, “आठवण येते म्हणून ही सतत मला इन्स्टाग्रामवर मीम्स पाठवत असते. आठवणीत मीम्स पाठवणं एवढंच नसतं. तू कशी आहेस? तुझा मूड कसा आहे? सगळं काही ठिक आहे का? असं विचारण खूप महत्त्वाचं आहे. फक्त मैत्रीमध्येच नाही तर प्रत्येक नात्यामध्ये असं विचारणं खूप महत्त्वाचं असतं. मीम्स पाठवले म्हणजे आठवण येते असं नाही. तो टाइम पास असतो.”

हेही वाचा – Bigg Boss OTT 2: मनीषा रानीला टार्गेट केल्यामुळे वडील प्रमोद कुमार यांनी सलमान खानविषयी केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

यावर पुन्हा पूजा बोलते की, “माझा स्वभाव तसा आहे. जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी घरात बसते किंवा घरातून फोन वगैरे करून बोलते. पण असं काही नसतं की, तू माझ्या मनात नाही किंवा मी तुझा विचार करत नाही. बऱ्याचदा मी एकटी असते. तेव्हा मला असं वाटतं असतं की, हे आपण रेश्माला सांगू या. हे आपण रेश्माबरोबर करू या. आणि नेहमी मी जेव्हा हिला फोन करते तेव्हा ही ओरडायला सुरुवात करते. आता वेळ मिळाला का? काय काम आहे? आज कशी काय आठवण आली? असं हिचं सुरू असतं. पण माझा नेहमी हिला हा प्रश्न असतो की, तू कशी आहेस ते सांग? शूटमध्ये आहे का? दमली आहेस का? वगैरे.” यानंतर रेश्मा बोलते की, “हे खरं आहे.” असे गमतीशीर किस्से या दोघींनी या व्हिडीओत सांगितले आहेत.

हेही वाचा – ‘हर एक फ्रेंड जरूरी होता है’ म्हणतं सोनाली कुलकर्णीनं खास मैत्रिणीबरोबरचा डान्स व्हिडीओ केला शेअर

दरम्यान, रेश्मा व पूजाच्या मैत्रीचं नातं आपण याआधी फोटो व व्हिडीओमधून बऱ्याचदा पाहिलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पूजाची आई रेश्मासाठी खास जेवण बनवताना दिसली होती. त्यासंबंधीचा व्हिडीओ रेश्मानं सोशल मीडियावर शेअर केला होता.