‘सूर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सहावं पर्व ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तर या पर्वाचं सूत्रसंचालन रसिका सुनील करत आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीच्या ऐवजी रसिका सुनील करणार असल्याचे जाहीर होताच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण त्याच वेळी रसिकाने स्पृहाला एक मेसेज केला आणि त्या मेसेजला स्पृहाने काय उत्तर दिलं हे आता रसिकाने सांगितलं आहे.

रसिका पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार असल्याने तिचे चाहते खुश झाले, तर दुसरीकडे स्पृहा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नसल्याने काहींनी निराशा व्यक्त केली. त्याबरोबरच काही जणांकडून रसिका आणि स्पृहा यांची सूत्रसंचालिका म्हणून तुलना केली गेली. अशा प्रतिक्रिया येऊ शकतात याचा रसिकाला अजिबातच अंदाज नव्हता.

tv serial actress arrested for kidnapping 4 year child in vasai zws
अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Young man cheated and raped in Vasai carime
रॉंग नंबर तिला महागात पडला..; तरुणाने फसवून केला बलात्कार
BJP MNS Thackeray groups are aggressive after getting bail for the accused who molested a minor girl thane news
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: आरोपीला जामीन मिळाल्याने भाजप, मनसे, ठाकरे गट आक्रमक
alcoholic father sexual abuse 14 year old girl by threatening to kill her
बाप नव्हे राक्षसच… पत्नी बाहेर जाताच करायचा मुलीवर बलात्कार
59-year-old man fell in one side love with 17-year-old girl and hit bike due to rejection
५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…
Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
Ratan Tata Died at 86 in Marathi
Raj Thackeray Letter To PM : “रतन टाटा हयात असतानाच भारतरत्न द्यायला हवा होता, पण…”, राज ठाकरेंचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

आणखी वाचा : जो मुलगा सुरुवातीला अजिबात आवडायचा नाही त्याच्याशीच झालं लग्न, ‘अशी’ आहे स्पृहा जोशीची फिल्मी लव्हस्टोरी

कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून रसिकाचं नाव जाहीर झाल्यावर अनेक प्रेक्षकांकडून “सूत्रसंचालिका म्हणून आम्हाला स्पृहाच हवी” अशी मागणी होऊ लागली. पण हा कार्यक्रम रसिकांनी स्वीकारण्याच्या आधी रसिका आणि स्पृहाचं काही बोलणं झालं नव्हतं. सोशल मीडियावरून मिळणारा प्रतिसाद बघून रसिकाने स्पृहाला एक मेसेज केला असल्याचं स्पृहाने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं. “इतकी वर्ष तू या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खूप छानप्रकारे केलंस. आता ते मी करत आहे. तर तू ते बघ आणि तुझ्याकडून काही टिप्स असतील, काही सुधारणा हव्या असतील तर मला नक्की सांग.” असं रसिकाने त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.

हेही वाचा : “…म्हणून स्पृहाच्या ऐवजी मला ‘सूर नवा ध्यास नवा’साठी विचारण्यात आलं,” रसिका सुनीलने सांगितलं कारण, जाणून घ्या काय म्हणाली अभिनेत्री?

रसिकाने स्पृहाला पाठवलेल्या या मेसेजला स्पृहानेही खूप छान रिप्लाय दिल्याचं रसिका म्हणाली. तिने एका मुलाखतीत सांगितलं, “मी तिला प्रेमाने एक मेसेज केला की, हे तुझं बाळ आहे इतके वर्ष तू त्याला प्रेमाने सांभाळलं आहेस आता मी त्याला सांभाळणार आहे. त्यावर तिचा फार गोड रिप्लाय आला. ती अत्यंत नम्रपणे आणि प्रेमाने बोलली की तुला काहीही कधीही मदत लागली तर मला नक्की सांग. त्यामुळे आमच्यातली ही देवाणघेवाण खूप हेल्दी झाली. मला असं वाटतं की हे आपल्या तिच्या कलाकारांमध्ये फार छानरित्या होत असतं.” त्यामुळे आता रसिका आणि स्पृहामधील हे बोलणं चर्चेत आलं आहे.