‘चार दिवस सासूचे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘सख्या रे’, ‘वहिनीसाहेब’ अशा मराठी मालिकांमधून आणि अनेक हिंदी मालिकांमधून रोहिणी हट्टंगडी घराघरांत पोहोचल्या. पण, याबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपट आणि नाटक यांमधून त्यांनी अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी टेलिव्हिजनमध्ये काम करावंसं नाही वाटत, असे म्हटले आहे.

काय म्हणाल्या अभिनेत्री?

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच अमोल परचुरेंच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सिनेमाच्या तुमच्या करिअरकडे या टप्प्यावर कसं बघता? की जसं काम येईल तसं मी करेन आणि मी एन्जॉय करेन किंवा नाटकाकडेच जास्त लक्ष देईन की असं काही ठरवलेलं नाही? यावर बोलताना रोहिणी हट्टंगडी यांनी म्हटले, “असं काही आधीही ठरवलं नव्हतं की कोणत्यातरी एकाच माध्यमात काम करायचं. ‘खानदान’ नावाची सीरियल केली होती, तेव्हापासून मी टेलिव्हिजन करतेय. माझ्या करिअरमध्ये एका माध्यमात काम नाहीये म्हणून दुसरीकडे केलंय असं कधी झालं नाहीये. फक्त आता वयानुसार, थकण्यानुसार म्हणा आता टेलिव्हिजन करावसं वाटत नाही. कारण टेलिव्हिजनमध्ये फार कमी समाधान मिळतं.”

Loksatta book Mark Twain Hucklebury Finn Novel Narrator
बुकरायण: ‘काळ्या’ पेन्सिलीची नैतिक जबाबदारी…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Karisma Kapoor Reveals Kareena Kapoor First Confession About Saif Ali Khan
करीना-सैफच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदा समजल्यावर ‘अशी’ होती करिश्मा कपूरची प्रतिक्रिया; म्हणाली, ‘लंडनमध्ये…’
aarti solanki reaction after suraj chavan won bigg boss marathi
“गरीब सूरजला जिंकवून माझ्यावर अन्याय”, मराठी अभिनेत्रीचं मोठं विधान; भावुक होत म्हणाली, “२४ वर्षांपासून या इंडस्ट्रीत…”
Supriya Sule Post for Suraj Chavan Bigg boss marathi winner
Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”
Bigg Boss 18 nia sharma not going in salman khan show
Bigg Boss 18 : ग्रँड प्रिमियरच्या काही तासांआधी लोकप्रिय अभिनेत्रीने सलमान खानच्या शोला दिला नकार, पोस्ट करत म्हणाली, “मला दोष…”
daljeet kaur
पहिल्या लग्नापासून मुलगा, अवघ्या ८ महिन्यात मोडलं दुसरं लग्न; अभिनेत्रीला विकावं लागलं राहतं घर, म्हणाली…
sai ali khan on adipurush controversy
‘आदिपुरुष’मध्ये रावण साकारल्यावर झाली टीका; सैफ अली खान पहिल्यांदाच झाला व्यक्त, म्हणाला…

“काम करण्याची जी परिस्थिती आहे ती माझ्यासाठी अनुकूल नाहीये, असं मला स्वत:ला वाटतं. माझ्याकडे एखादं नाटक असेल आणि एखाद्या मालिकेत काम करण्यासाठी विचारले तर मी नाटक करेन. जरी ती मालिका फार जास्त काळ चालणारी असेल तरी मी नाटक करेन. नाटकाचे कितीही कमी प्रयोग झाले तरी त्यात मला समाधान मिळतं. कारण टेलिव्हिजनमध्ये आज काय सीन करायचा आहे, याबद्दल माहिती नसते किंवा रात्री मला सांगण्यात येतं की उद्या सकाळी आठ वाजताची शिफ्ट आहे. हे नाही जमत मला. मग एकमेकांना दोष देण्याचा खेळ सुरू होतो; हे चक्रच आहे.”

हेही वाचा: अमिताभ बच्चन यांचे साडू आहेत प्रसिद्ध अभिनेते, दोघांनी एकत्र केलंय काम, तुम्ही त्यांचे ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

“पूर्वी हिंदीमध्ये हे जरा जास्त होतं. मला वाटतं ‘डोर’ नावाच्या एका हिंदी मालिकेत मी काम करत होते. सोमवारी आम्हाला बोलवलं, ९ वाजताची शिफ्ट होती. ९ वाजता आलो, ११ वाजेपर्यंत खूप आरामात तयार झालो. आम्ही तयार झालो तरी सीन नाही आला. विचारलं तर, अजून सीन यायचा आहे असं सांगितलं. मग म्हटलं, कधीचा? तर उद्याचा, असं उत्तर मिळालं. ती सीरियल बंद झाल्यानंतर मराठी मालिकेमध्येच काम केलं होतं. त्यावेळी मराठीमध्ये चांगली परिस्थिती होती. आता तिथेपण हिंदीसारखीच परिस्थिती झाली आहे.”

दरम्यान, रोहिणी हट्टंगडी यांचे ‘चारचौघी’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळत आहे.