‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडली. त्यांनी २०२२ मध्ये मालिका सोडली आणि त्यानंतर निर्मात्यांवर थकबाकीवरून गंभीर आरोप केले. त्यानंतर आता त्यांनी एका मुलाखतीत शो सोडण्यास कोणती गोष्ट कारणीभूत ठरली, याचा खुलासा केला आहे.

‘लल्लनटॉप’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शैलेश लोढा यांनी पहिल्यांदाच हा शो का सोडला याबद्दल खुलासा केला. शैलेश लोढा यांना सब टीव्हीवरील ‘गुड नाईट इंडिया’ या स्टँड-अप शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा असित मोदींनी आपल्याला वाईट वागणूक दिली आणि त्या शोचा भाग असल्याबद्दल अपमानित केले असं शैलेश म्हणाले. इतकंच नाही तर एकदा शोमध्ये असित मोदींनी कलाकारांना नोकरांप्रमाणे अपमानास्पद वागणूक दिली होती, असा दावाही शैलेश यांनी केला.

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”

Farrey Teaser: सलमान खानने भाची अलिजेहला बॉलीवूडमध्ये केलं लाँच, ‘फर्रे’चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

दुसऱ्या शोचा उल्लेख करत शैलेश म्हणाले, “मी त्यासाठी शूट केले आणि तिथे एक कविताही पाठ केली. टेलिकास्टच्या एक दिवस आधी, तारक मेहताच्या निर्मात्यांनी मला फोन केला आणि विचारलं की मी त्या शोमध्ये कसा जाऊ शकतो. त्यांनी वापरलेली भाषा सभ्य नव्हती, त्यामुळे मला राग आला. ते माझ्याशी ज्या प्रकारे बोलत होते ते मला सहन होत नव्हतं. एक शो फक्त एका व्यक्तीने नाही तर अनेक लोक एकत्र येऊन बनवला जातो. मी त्यांना १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मेल केला की मला शो सुरू ठेवायला जमणार नाही. पण आपले पात्र बदलायला वेळ लागू शकतो, ही निर्मात्यांची अडचण समजून घेत मी शूटिंगसाठी जात राहिलो.”

Photos: भरजरी लेहेंगा, ओढणीवर राघवरावांचं नाव अन्…; परिणीती चोप्राच्या लग्नातील फोटोंनी वेधलं लक्ष

अभिनेत्याने पुढे असा दावा केला की निर्मात्याने त्यांचे पैसे दिले नव्हते. ते पैसे न देऊन मला दबावात आणण्याचा प्रयत्न करत होते. “असित मोदींनी मला एका करारावर सही करायला सांगितलं होतं, ज्यामुळे माझे अधिकार कमी झाले असते. पण मी त्यांना भेटण्यास उत्सुक नव्हतो. त्यानंतर ५ एप्रिल रोजी मी आणखी एक मेल पाठवला आणि सांगितलं की माझा चांगुलपणा म्हणून शूटिंग करत आहे परंतु ते मी पुढे चालू ठेवणार नाही,” असं त्यांनी सांगितलं.

शैलेश पुढे म्हणाले, “मी सोशल मीडियावर बोलण्यापूर्वी किंवा मीडियाशी बोलण्यापूर्वी त्यांची परवानगी का घ्यावी? हे माझे मूलभूत अधिकार आहेत आणि मी शो सोडल्यानंतर त्यांचं का ऐकू? हा मुद्दा कधीच पैसे किंवा पेमेंटचा नव्हता तर ते अपमानास्पद भाषेत कसे बोलले याबद्दल होता. त्यामुळे मला न्यायालयात जावे लागले आणि तोडगा निघाला.”

दरम्यान, थकबाकीवरून झालेल्या वादानंतर असित मोदींनी प्रतिक्रिया दिली होती. असित मोदींनी त्यांच्या ट्विटरवर लिहिलं होतं, “गोष्टी रेकॉर्डवर ठेवण्यासाठी शैलेश लोढा यांनी त्यांच्या रिलिव्हींग औपचारिकता पूर्ण करण्यास आणि एक्झिट कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला होता. हे प्रलंबित असल्याने आम्ही त्यांची थकबाकी देऊ शकत नव्हतो. नीला फिल्म्सने त्यांचे इनव्हॉइस मिळताच त्यांच्या थकबाकीवर टीडीएस कापून भरला होता. आम्ही त्यांच्या थकबाकीसाठी डिमांड ड्राफ्ट देखील तयार केला होता.”