‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. लवकरच मालिकेत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका २५ वर्षांचा लीप घेणार असून गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण मालिकेतील बऱ्याच पात्रांचा प्रवास आता संपणार आहे. मालिकेच्या नव्या कथानकात ही पात्र झळकणार नाहीयेत.

हेही वाचा – “सदैव आठवणीत…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीची भावुक पोस्ट; सेटवरचे शेवटचे फोटो शेअर करत म्हणाली…

Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
chhaava movie santosh juvekar talks about last scene of movie
“आपले महाराज एकटे…”, ‘छावा’मधला ‘तो’ शेवटचा सीन आठवून संतोष जुवेकरचे डोळे पाणावले; साकारतोय ‘ही’ भूमिका
Marathi actress Tejashri Pradhan Talk about Divorce controversy
घटस्फोटानंतर तेजश्री प्रधान सगळ्यांना कशी सामोरे गेली? म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यासाठी त्याला…”
Sadness A Truth
दु:ख : एक सत्य!
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar make cold coffee for spardha thigle
‘प्रेमाची गोष्ट’ फेम अपूर्वा नेमळेकरने नव्या मुक्तासाठी केली ‘ही’ खास गोष्ट, स्वरदा ठिगळे फोटो शेअर करत म्हणाली…

गेल्या सव्वा तीन वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. गौरी, जयदीप, शालिनी, देवकी, माई, मल्हार, लक्ष्मी अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. पण आता गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथानकात यातील बरीच पात्र दिसणार नाहीयेत. यामध्ये एका लाडक्या जोडीचा देखील समावेश आहे.

हेही वाचा – उर्मिला निंबाळकरच्या लेकाबरोबर नेमकी काय घडली होती विचित्र घटना? जाणून घ्या…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. कटकारस्थानी बायको आणि साधा-भोळा नवरा असलेली या जोडीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण आता ही जोडी नव्या कथानकात दिसणार नाहीये. आतापर्यंत तुम्ही ही जोडी कोण आहे? हे ओळखलंच असेल. ही लाडकी जोडी म्हणजे शालिनी आणि मल्हाराची जोडी. होय, गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेमध्ये शालिनी आणि मल्हार झळकणार नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच दोघांचे म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर आणि अभिनेता कपिल होनराव यांचे शेवटचे शूटिंग पार पडले. त्यामुळे आता या नव्या कथेमध्ये खलनायिका कोण असणार? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं”, मलायका अरोराची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाली, “प्रामाणिक…”

दरम्यान, सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका रात्री ९.३० प्रसारित होत आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून मालिका रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच सध्याच्या वेळेत म्हणजेच रात्री ९.३० वाजता ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Story img Loader