‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. गिरीजा प्रभु, मंदार जाधव, माधवी निमकर, वर्षा उसगावकर, मिनाक्षी राठोड, सुनिल गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. लवकरच मालिकेत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका २५ वर्षांचा लीप घेणार असून गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण मालिकेतील बऱ्याच पात्रांचा प्रवास आता संपणार आहे. मालिकेच्या नव्या कथानकात ही पात्र झळकणार नाहीयेत.

हेही वाचा – “सदैव आठवणीत…”, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्रीची भावुक पोस्ट; सेटवरचे शेवटचे फोटो शेअर करत म्हणाली…

sun transit in libra
३६५ दिवसांनंतर ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत करणार प्रवेश! ‘या; राशीच्या लोकांना मिळणार पद-प्रतिष्ठा, प्रत्येक कामात यश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख
Counselling Different behaviors by mother with two sisters
समुपदेशन : आईकडून बहिणींमध्ये दुजाभाव?
Mercury-Ketu will come together after 18 years
१८ वर्षांनंतर बुध-केतू येणार एकत्र; कन्या राशीतील युती ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

गेल्या सव्वा तीन वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने निभावलेलं प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं आहे. गौरी, जयदीप, शालिनी, देवकी, माई, मल्हार, लक्ष्मी अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे. पण आता गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथानकात यातील बरीच पात्र दिसणार नाहीयेत. यामध्ये एका लाडक्या जोडीचा देखील समावेश आहे.

हेही वाचा – उर्मिला निंबाळकरच्या लेकाबरोबर नेमकी काय घडली होती विचित्र घटना? जाणून घ्या…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. कटकारस्थानी बायको आणि साधा-भोळा नवरा असलेली या जोडीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पण आता ही जोडी नव्या कथानकात दिसणार नाहीये. आतापर्यंत तुम्ही ही जोडी कोण आहे? हे ओळखलंच असेल. ही लाडकी जोडी म्हणजे शालिनी आणि मल्हाराची जोडी. होय, गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माच्या कथेमध्ये शालिनी आणि मल्हार झळकणार नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच दोघांचे म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर आणि अभिनेता कपिल होनराव यांचे शेवटचे शूटिंग पार पडले. त्यामुळे आता या नव्या कथेमध्ये खलनायिका कोण असणार? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं”, मलायका अरोराची लेकासाठी खास पोस्ट, म्हणाली, “प्रामाणिक…”

दरम्यान, सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका रात्री ९.३० प्रसारित होत आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून मालिका रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच सध्याच्या वेळेत म्हणजेच रात्री ९.३० वाजता ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.