अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. करिअरची सुरुवात करताना या अभिनेत्रीला खूप स्ट्रगल करावं लागलं. लहानसहान भूमिका करीत शर्मिष्ठानं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सुरुवातीला असंही झालं की, कित्येक महिने तिच्याकडे बिलकूल काम नव्हतं. तेव्हा तिनं अभिनय क्षेत्र सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.

डिसेंबरपर्यंत मनासारखं काम मिळालं नाही, तर नोकरी करीत ती करिअरच्या दुसऱ्या मार्गाला वळणार होती. परंतु, एका फोन कॉलनं तिचं नशीब पालटलं. शर्मिष्ठानं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान शर्मिष्ठानं तिच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे.

Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Renukaswamy murder case photo
Pavithra Gowda: ‘खून होण्याआधी तो हात जोडून…’, अभिनेता दर्शनच्या अत्याचारामुळे मृत चाहत्याचे पालक हादरले
bombay hc refuses to direct cbfc to release certification copy to kangana ranaut emergency
Emergency Movie : कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर; प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
kangana Ranaut is disappointed after the film Emergency did not get Censor Board certification
हतोत्साहित करणारे, अन्यायकारक! ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे कंगना राणावत निराश
actress kangana ranaut praises indira gandhi during promotion of upcoming hindi film emergency
इंदिरा गांधींच्या आयुष्यातून खूप काही शिकण्यासारखं! अभिनेत्री दिग्दर्शक कंगना राणावतचे मत
Mardaani 3 Movie Announcement
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चित्रपटाची घोषणा

शर्मिष्ठा म्हणाली, “मला ब्रेक मिळत नव्हता. मी आता प्रचंड खूप ऑडिशन्स दिल्या आहेत. मला कंटाळाही यायचा; पण तरीही मी ऑडिशन देऊन यायचे. मग मी माझ्याच मनाशी ठरवलं की, २००८ सुरू होते आणि २००९ डिसेंबरपर्यंत जर आपल्याला संधी मिळाली नाही, तर गपगुमान नोकरी करायची. मग डिसेंबर उजाडला आणि म्हटलं, आता एक महिना उरलाय. आता काही नाही होणार.”

हेही वाचा… “माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी…”, घटस्फोट घेतल्यानंतर शर्मिष्ठा राऊतची झाली होती ‘अशी’ अवस्था, अभिनेत्री म्हणाली…

शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “२९ नोव्हेंबरला मला अभिजीत केळकरने फोन केला होता. आमची ओळख ‘चार दिवस सासूचे’ मालिकेत काम करताना झाली होती. आम्ही एक वर्षभर एकत्र होतो. त्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला, “मी स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेत काम करतोय. तर यांना प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री बदलायची आहे. तेव्हा मी म्हटलं की, अरे यार, कायम बदलीची भूमिकाच येते आणि प्रमुख भूमिका बदलायची असते तेव्हाच मी का आठवतेय.”

तेव्हा अभिजीत मला म्हणाला, “नाही, ऐक ना तू कर ही मालिका. २८ की ३० च एपिसोड झालेत या मालिकेचे. तू एकदा ये आणि ऑडिशन दे.”

मी त्याला म्हटलं, “अरे, याच मालिकेसाठी मी लहान लहान भूमिकेसाठी चार वेळा रिजेक्ट झालेय. तू प्रमुख भूमिकेचं काय घेऊन बसलायस. मग तो मला म्हणाला की, तू एकदा ये आणि प्रयत्न कर”

“मी घाईत ब्रूक स्टुडिओला पोहोचले. मला आठवतं की, ऑडिशनच्या रांगेत माझा १६९ नंबर होता. मी ऑडिशन दिली. ऑडिशन दिल्यानंतर मी हेअर ड्रेसर वगैरे होते तिथे गेले. तिथे त्या विद्याताई मला म्हणाल्या, की दुसरा चेंज सांगितलाय आणि असं कोणाला सांगत नाही आहेत दुसरा चेंज आहे, तर तुम्ही तोपण करून बघा. कदाचित तुमचं काम होईल आणि दुसरा मी चेंज केला. तेव्हा महेशजी मला भेटले. कारण- ती महेश कोठारेंची मालिका होती. त्यांचीही ती निर्माता म्हणून पहिली मालिका होती. आणि ते मला म्हणाले की, डार्लिंग काम करेंगे. मी सांगतो चॅनेलला, मी बोलतो काही काळजी करू नकोस. मी म्हटलं, अरे हे काय झालंय.” शर्मिष्ठा असं म्हणाली.

हेही वाचा… “…अन् मला कॉम्प्रोमाईजसाठी विचारलं”, शर्मिष्ठा राऊतने सांगितला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली…

“नंतर लगेच ४ डिसेंबरला मला कॉल आला की, तू ये आपण करतोय. मला असं झालं होतं की, अरे, ज्या मालिकेत मला लहान भूमिकांसाठी चार वेळा नाकारलं होतं. त्यात मला प्रमुख भूमिका कशी काय मिळाली. या संधीसाठी मी नेहमीच अभिजीतचे आभार मानेन.” असं शर्मिष्ठानं नमूद केलं.