‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ व ‘३६ गुणी जोडी’ या मालिका कमी टीआरपीमुळे बंद होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं. ही गोष्ट ताजी असतानाच आता ‘झी मराठी’वरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरची ‘लवंगी मिरची’ लवकरच बंद होणार आहे. आणि याचंही कारण टीआरपीच आहे.

अभिनेत्री शिवानी बावकरची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका जी तिच्या पहिल्या मालिकेपेक्षा जास्त काळ चालेली नाही. अभिनेत्रीच्या ‘लागिर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. २०१७ साली सुरू झालेली ही मालिका २०१९ पर्यंत चालली होती. त्यानंतर शिवानीची ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ व ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण या मालिका जास्त काळ टिकाव धरू शकल्या नाहीत. या दोन्ही मालिकांनाही सहा महिन्यात गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर आता शिवानीची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका आहे, जी अल्पावधीत बंद होत आहे.

salman khan big boss 18 date time and new theme
Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sanjay Manjrekar on Mohammed Shami for Border Gavaskar Trophy
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमी फिट नसेल तर ‘हा’ गोलंदाज उत्तम पर्याय; संजय मांजरेकरांचं वक्तव्य
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
A new serial will be aired on Marathi channels
मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांचा श्रीगणेशा
marathi movie Phulvanti will be released on October 11
‘फुलवंती’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gautam Gambhir and Virat Kohli on Jasprit Bumrah Mohammed Shami and Mohammed Siraj
Gautam Gambhir : बुमराह, शमी, सिराजसाठी गोलंदाजी हीच ‘ध्यानधारणा व मन:शांती’, गौतम गंभीरचे वक्तव्य
Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?

हेही वाचा – “नको गं नको” मृण्मयी देशपांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवर बिग बॉस फेम ‘अभिनेत्याची’ प्रतिक्रिया

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरची अर्जुन-सायलीची पहिली भेट कशी होती?, जाणून घ्या

१३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेली ‘लवंगी मिरची’ ही मालिका प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरली नाही. तसेच या मालिकेचा टीआरपीही कमी होता. त्यामुळे ‘लवंगी मिरची’ मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – टोमॅटोचे भाव कमी होतील का? महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? मराठी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या मालिकेचे टेलिकास्ट होणार आहे. त्यानंतर या मालिकेच्या जागी ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ पाहायला मिळणार आहे.