छोट्या पडद्यावरील सर्वच मालिका या प्रेक्षकांसाठी कायमच खास असतात. या मालिकांच्या निमित्त विविध विषय हाताळले जातात. लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन धागा धागा जोडते नवा’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमोही समोर आला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर याचा एक प्रोमो शेअर केला आहे. यात अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत दिसत आहे. ‘लग्न झालं की मुलीचा माहेरशी असलेला संबंध खरंच संपतो..?’ अशा आशयाची ही मालिका असणार आहे. येत्या ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा: “मी बायोपिकसाठी खूप वाट पाहिली”, अंकुश चौधरीचे वक्तव्य चर्चेत, म्हणाला “प्रत्येक वेळी सुबोधच…”

Festival of 16 films by German director Wim Wenders
जर्मन दिग्दर्शक विम वेंडर्स यांच्या १६ चित्रपटांचा महोत्सव; या चित्रपटांचे खेळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Premachi Goshta Fame swarda thigale aerial yoga in aata hou de dhingana season 3
Video: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील नव्या मुक्ताचं ‘हे’ कौशल्य पाहून चकित व्हाल, ‘स्टार प्रवाह’च्या अभिनेत्यांचीही झाली हालत खराब
aai kuthe kay karte fame Madhurani prabhulkar entry in Aai Ani Baba Retire Hot Aahet serial
Video: अरुंधती आली परत! ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार, म्हणाली, “जवळपास एक-दीड महिना…”
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
game changer ott release
रामचरण-कियारा अडवाणीचा फ्लॉप ‘गेम चेंजर’ महिनाभरातच OTT वर रिलीज होणार; कधी, कुठे पाहता येईल? वाचा

मात्र स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नुकतंच या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पूजा बिरारी हिने पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने स्वत:चा फोटो शेअर करत ‘बिईंग पल्लवी’ असे म्हणतं आभार व्यक्त केले आहेत. नुकतंच या मालिकेचा शेवटच्या भागाचे शूटींग करण्यात आले.

दरम्यान ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित व्हायची. मात्र या मालिकेच्या जागी आता ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेसाठी जुन्या मालिकेचे कथानक पटापट पुढे ढकललं जात असल्याचा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे.

Story img Loader