‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही चांगलीच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे आता नवं पर्व सुरु झालं आहे. यात शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. या मालिकेत मल्हार हे पात्र साकारणाऱ्या अभिनेता कपिल होनरावने एक्झिट घेतली. नुकतंच त्याच्यासाठी शालिनीने एक पोस्ट शेअर केली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत शालिनी हे पात्र माधवी निमकर साकारत आहे. नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने मल्हारबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या पोस्टमध्ये तिने त्याचे आभार मानले आहेत.

Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Haldi Ceremony Viral Video
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
Premachi Goshta Fame Mrunali Shirke appear in hindi serial ghum hai kisikey pyaar meiin
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
Aunty dance Hawa Hawa Aye Hawa
“हवा हवा ऐ हवा, खुशबू लुटा दे…” गाण्यावर काकूंनी केला दिलखुलास डान्स, Viral Video पाहून तुम्ही व्हाल खुश, एकदा बघाच
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
myra vaikul emotional
Video : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला मायरा वायकुळ झाली भावुक; रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

माधवी निमकरची पोस्ट

“आपण एकत्र काम करण्याचा हा प्रवास खूपच मस्त होता. गेली ३ वर्ष कधी संपली, कळालंच नाही. शालिनी आणि मल्हार म्हणून कितीतरी सुंदर आठवणी आहेत. मजा, मस्ती, गप्पा अशा खूप खूप आठवणी आहेत.

शालिनी मल्हारचा प्रवास थांबला. पण नक्कीच लवकरच परत एकत्र काम करु. शालिनी-मल्हार जोडीला खरंच भरभरुन प्रेम मिळालं. माझी ही पोस्ट सर्व फॅन पेजेससाठीही आहे. ज्यांनी आमचे रिल्स, फोटो, पोस्ट करुन त्यांचं आणि त्यांना फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांचे मनापासून आभार. तुमचे हेच प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद असाच कायम ठेवा”, असे माधवीने म्हटले आहे.

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या नव्या पर्वात अनेक नवीन कलाकार झळकणार आहेत. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, गिरीश ओक, अमेय बर्वे, मयुर पवार हे कलाकार या मालिकेत झळकताना दिसत आहेत. त्याबरोबरच यात गौरी, मल्हार, शालिनी यांच्याही भूमिका पाहायला मिळत आहेत.

Story img Loader