काही कलाकृती प्रेक्षकांच्या दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतात. एखादा चित्रपट किंवा मालिका ही त्याच्या कथानक, कलाकारांचा अभिनय, पुढे जाणारी गोष्ट यामुळे लक्षात राहते. अशाच एका मालिकांपैकी एक म्हणजे ‘का रे दुरावा’ ही मालिका आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेतील जय व अदिती या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. ‘का रे दुरावा’ या मालिकेत जयची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुयश टिळक(Suyash Tilak)ने एका मुलाखतीत त्याला ही भूमिका कशी मिळाली होती, याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला सुयश टिळक?

अभिनेता सुयश टिळकने गोळाबेरीज या पॉडकास्ट चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला का रे दुरावा या मालिकेत भूमिका कशी मिळाली, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना सुयशने म्हटले, “गंमत अशी आहे की, ती मालिका माझ्याच नशिबात लिहिली होती. त्याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की, जेव्हा मी अभिनेता म्हणून सुरुवात केली तेव्हा मी काही मालिकांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून काम करीत होतो. काही भूमिका किंवा काही कॅरेक्टर्स करत होतो; लीड म्हणून काम करत नव्हतो. त्याआधी मी एक मालिका करीत होतो. ‘का रे दुरावा’साठी मी ऑडिशन दिली होती. पण एक-दीड महिना मला त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळालं नाही. महिना-दीड महिना मला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे मला वाटलं की, माझी निवड झाली नाहीये किंवा माझ्याशिवाय ती मालिका होत आहे. त्यावेळी मी पुढचं पाऊल नावाची मालिका करीत होतो. ‘पुढचं पाऊल’ सुरू असताना मला दूर्वा नावाची मालिका मिळाली. त्यात मला फार वेगळं पात्र मला साकारायला मिळालं. भूपती पाटीलच्या त्या पात्रानं मला खूप समृद्ध केलं. बऱ्याच गोष्टी त्या मालिकेदरम्यान घडत होत्या.”

What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

“जवळजवळ एक वर्ष त्या मालिकेत मी काम करत होतो आणि जसा माझा मालिकेतील प्रवास संपला तसा मला परत फोन आला. मला सांगितलं गेलं की, एक ऑडिशन करायची आहे, तर तू येऊन जा. मी ऑडिशनला गेलो. स्क्रिप्ट वाचली आणि म्हटलं वर्षभरापूर्वी याच दोन पात्रांसाठी ऑडिशन केली होती का? तर तो कास्टिंग डायरेक्टर म्हणाला की, हो तेच पात्र आहे; फक्त आता स्टोरी पुढे गेली आहे. तर आधी जी स्टोरी होती. जय आणि अदिती ही दोन पात्रे एकमेकांच्या प्रेमात पडतात. जय तिला इम्प्रेस करायला वेगवेगळे फंडे वापरत असतो. ती लव्ह स्टोरी, मग पुढे लग्न आणि मग पुढचा प्रवास, असं होतं. वर्षभर मालिका काही झाली नव्हती. डायरेक्ट असं ठरलं होतं की, आता लग्नापुढचा प्रवास दाखवायचा.”

हेही वाचा: Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”

“मी ऑडिशन दिली; पण त्यानंतरही काही पटकन प्रतिसाद मिळाला नाही. काही गोष्टी घडत नव्हत्या. खासगी आयुष्यातील काही गोष्टींबरोबरसुद्धा मी संघर्ष करत होतो. तर मी मुंबईतून पुण्याला यायला निघालो होतो. तर मला फोन आला की, संध्याकाळी लूक टेस्ट करायची आहे, तर तू ये. मी त्याला म्हटलं की, मी निघालोय पुण्याला. तर तो मला म्हणाला की, वेडेपणा करू नकोस. ये परत. मला असं झालेलं की, मला आता परफॉर्म करता येणार नाही. कारण- मी वेगळ्या मनस्थितीत आहे. डोक्यात अनेक विचार चालू होते. तिथे मी पोहोचलो. माझा व सुरुचीचा सीन शूट करायचा होता. त्यावेळी मी सुरुचीशी खूप भावनाहीनपणे वागलो. मी थेट गेलो, सीन वाचला. म्हटलं सांगा काय करायचं आहे ते. मला निघायचं होतं. कारण- मी डिस्टर्ब होतो. मला असं झालं होतं की, मला आता नकोय शूटिंग, प्रोजेक्ट, काम काही नकोय. थोडी शांतता पाहिजे होती. मित्रमंडळी, घरचे लोक पाहिजे होते. मी गेलो, शूट केलं आणि मी विचारलंही नाही की काय झालं, कसं झालं आणि मी निघालो.”

“मी संध्याकाळी घरी पोहोचत होतो तोपर्यंत मला फोन आला की, अमुक अशा तारखेपासून आपण ऑन फ्लोअर जातोय. चॅनेलला ऑडिशन खूप आवडली आहे. मी म्हटलं हे कसं शक्य आहे? तर तो मला म्हणाला की, मस्त झाला सीन. मला विश्वास बसत नव्हता. झी मराठी हे घराघरांत पोहोचलेलं चॅनेल होतं. त्या वाहिनीवर लीड कॅरेक्टर करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ते झालं असं, जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला खूप वेळ गेला पचवायला. मी पुण्याला येऊन लगेच परत निघालो”, अशी आठवण अभिनेत्याने सांगितली आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: करणवीर मेहराने पूर्वाश्रमीच्या दोन पत्नीविषयी केलं भाष्य, भावुक होत म्हणाला, “दोघींच्या आयुष्यात मी…”

दरम्यान, सध्या सुयश टिळक व सुरुची अडारकर ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Story img Loader