छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतात. त्यामुळे जेव्हा या मालिका निरोप घेतात तेव्हा अनेकांना दु:ख होते. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अशाच एका लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या मालिकेने ६९९ भागांचा यशस्वी टप्पा पूर्ण करून प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आदिती सूर्यवंशी ही भूमिका साकारली होती. आसावरी जोशींच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यामुळे आता मालिकेचा शेवट झाल्यावर त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करीत भावना व्यक्त केल्या आहेत.

आसावरी जोशींनी लिहिले आहे की, “आमची मालिका ‘स्वाभिमान’ आज प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. यामुळे माझ्याप्रमाणे तुम्हीसुद्धा भावुक झाला असाल, आम्ही आज मालिकेचा शेवट करीत आहोत. तुम्हा सर्वांचे मनोरंजन करता आले याचा अतिशय आनंद आहे. लवकरच मी एका नव्या मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तुमच्या सदिच्छांची गरज आहे…धन्यवाद!” आसावरी जोशी यांच्या या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘स्वाभिमान-शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत होते, तर आसावरी जोशी यांनी शांतनूची आई अर्थात आदिती सूर्यवंशी यांची भूमिका साकारली होती. यासोबतच सविता प्रभुणे, अशोक शिंदे, प्रसाद पंडित या कलाकारांचा सुद्धा मालिकेत सहभाग होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhiman shod astitvacha marathi serial off air actress asawari joshi shared emotional post sva 00
Show comments