‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटवर मोठा वाद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जेठालाल गडाची भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी यांचं शोचे निर्माते असित मोदी यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले. दिलीप यांनी रागात असित यांची कॉलर धरली, असे वृत्त न्यूज १८ ने दिले होते. यावर शोमध्ये आत्माराम भिडे हे पात्र साकारणारा मंदार चांदवडकर याने प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप जोशी यांनी काही दिवसांची सुट्टी मागितली होती. दिलीप जोशी आपल्या सुट्ट्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा असित मोदी यांनी संभाषण टाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे दिलीप चिडले. असित हे दिलीप जोशी यांच्याकडे दुर्लक्ष करून कुश शाहला भेटायला गेले, त्यामुळे दिलीप यांना अपमानास्पद वाटलं. कुशने नुकतीच मालिका सोडली आहे. भांडण इतकं कडाक्याचं झालं की दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर देखील धरली होती. अशी बातमी समोर आली होती. ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना मंदार चांदवडकरने हे वृत्त फेटाळले आहे.

Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Abhishek Bachchan
“आराध्याकडून कोणत्या अपेक्षा…”, अभिषेक बच्चन पालकत्वावर बोलताना म्हणाला, “फक्त आई-वडिलांनी…”
What Ajit Pawar Said About Saif Ali Khan
Ajit Pawar : सैफ अली खानवरील हल्ल्याचा घटनाक्रम सांगत अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “नवा मुद्दा आला की..”

हेही वाचा – कश्मीरा शाहचा अपघात कसा झाला, आता प्रकृती कशी आहे? तिची नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली…

मंदार चांदवडकर काय म्हणाला?

मंदारने असं काहीच घडलं नसल्याचं म्हटलं आहे. “काय फालतूपणा आहे हा? या अफवा कोणी पसरवल्या? आम्ही सर्वजण अगदी शांततेत आणि आनंदाने शूटिंग करत आहोत,” असं मंदार म्हणाला.

हेही वाचा – “बॉलीवूड कलाकार दारूची…”, दिलजीत दोसांझची ‘त्या’ नोटीसनंतर टीका; सरकारला आव्हान देत म्हणाला…

अमित भट्ट यांनीही अशी कोणतीच गोष्ट सेटवर घडल्याचं नाकारलं. या निव्वळ अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दिलीप जोशी व असित मोदी यांचं भांडण झालं नसून सगळे आनंदाने मालिकेचं शूटिंग करत आहेत.

Story img Loader