‘ठरलं तर मग’ या छोट्या पडद्यावरील मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेने या आठवड्यात सर्व रेकॉर्ड्स मोडत टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठला आहे. सर्वाधिक टीआरपी मिळवल्याने ‘ठरलं तर मग’ ही मालिका महाराष्ट्राची नंबर १ मालिका ठरली आहे. सध्या मालिकेत सायली-अर्जुन घरच्यांसमोर पुन्हा लग्न करत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. आता लवकरच मालिकेत एका जोगतीणीची एन्ट्री होणार आहे. सुभेदारांच्या घरात आल्यावर जोगतीण नेमकं काय सांगणार याचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘बिग बॉस १७’ ची दणक्यात सुरुवात, सलमान खानच्या शोमध्ये अंकिता लोखंडे-विकी जैनसह ‘हे’ १७ स्पर्धक सहभागी

abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
“…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
docudrama Mai, documentaries, documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
as Passenger requested to IndiGo pilot to speak in Hindi
प्रवाशाच्या विनंतीवरून पायलटने केली चक्क हिंदीमध्ये अनाउंसमेंट; नेटकरी म्हणाले, “खूप चांगला प्रयत्न केला” VIDEO VIRAL
Reserve Bank Deputy Governor Swaminathan warns Fintech to avoid debt recovery in wrong way
कर्जवसुली चुकीच्या पद्धतीने नको, रिझर्व्ह बँक डेप्युटी गव्हर्नर स्वामिनाथन यांचा ‘फिनटेक’ना इशारा
Royal Enfield Classic 350 vs Jawa 350 Bringing retro back
नवीन रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० विरुद्ध जावा ३५०; कोणती सर्वात जबरदस्त?
premachi goshta serial new mahaepisode mukta keep action against sawani
सावनीचा डाव मुक्ता उधळून लावणार? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? वाचा…
Final skull design with lattice structures. Journal of Institution of Engineers, India
इस्रोने गगनयानमधील ह्युमनॉइडच्या मेंदूसाठी कवटीची रचना कशी केली?; काय आहेत तिची वैशिष्ट्ये?

अस्मिता आणि प्रिया पूर्णा आजीला सायली विरुद्ध भडकवतात. त्यामुळे आजीच्या इच्छेमुळे अर्जुन पुन्हा एकदा सुभेदार कुटुंबीयांसमोर सायलीशी लग्न करतो. सायली आणि अर्जुनचं लग्न केवळ कॉन्ट्रॅक्ट म्हणून झालेलं असल्याने घडला प्रकार पाहून सायली चिडते. ‘तुम्ही असं का वागलात? आणि अन्नपूर्णा आजींच्या भावनांशी का खेळलात?’ असा जाब ती अर्जुनला विचारते. सायली भडकल्यावर अर्जुनला पुन्हा एकदा तो सायलीच्या प्रेमात पडल्याची जाणीव होते.

हेही वाचा : Video: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री गेली होती भारत-पाकिस्तान सामना प्रत्यक्ष पाहायला, अनुभव शेअर करत म्हणाली…

दुसरीकडे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुभेदारांच्या घरी पूजेचं आयोजन करण्यात येतं. यावेळी सायलीच्या हातून पूजा करूया असा आग्रह कल्पना पूर्णाआजीसमोर धरते आणि सायलीच्या हातून नवरात्रोत्सवाची पहिली पूजा सुभेदारांच्या घरात पार पडते. पूजा झाल्यावर सुभेदारांकडे अचानक एक जोगतीण जोगवा घेऊन येते. यावेळी ती, “अर्जुन म्हणजे शूर आणि सायली म्हणजे फुलासारखी नाजूक असं जरी असलं तरीही, तुम्ही दोघं लग्नाचं खोटं नाटक करत आहात” असं सर्वांसमोर सांगते. जोगतीणीने केलेलं धक्कादायक विधान ऐकून अर्जुन-सायली चांगलेच घाबरतात आणि सुभेदार कुटुंबीयांना जबरदस्त धक्का बसतो. असं ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली इकोफ्रेंडली आलिशान गाडी, किंमत माहितीये का?

जोगतीण आल्यामुळे सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड होणार का?, दोघांचं भांडं फुटणार का? मालिकेत पुढे काय होणार? हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, मोनिका दबडे, प्रिया तेंडुलकर, प्रियांका दिघे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.