‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अश्विनला त्याची गर्लफ्रेंड सोडून गेल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. अश्विन हा अर्जुनचा लहान भाऊ असल्याने त्याला या कठीण प्रसंगातून बाहेर काढण्याची संपूर्ण जबाबदारी सायली स्वत: घेते. दुसरीकडे भावाची अवस्था पाहून अर्जुन सुद्धा व्यथित झालेला असतो. त्यामुळे येत्या भागात सायली अर्जुनला महत्त्वाचा सल्ला देणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अश्विनची अवस्था पाहून अर्जुन सर्वांना ‘सगळ्या मुली अशाच असतात, फसवणूक करुन निघून जातात’ असा दोष देऊ लागतो. नवऱ्याच्या तोंडची वाक्य ऐकून, सायली अर्जुनला जोडीदाराचं महत्त्व काय असतं हे पटवून द्यायचं असा निर्धार करते. येत्या भागात अश्विन प्रकरणामुळे अर्जुन-सायलीच्या नात्यात नवीन वळण येणार असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

हेही वाचा : “बायको Happy Anniversary”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण! पत्नीला म्हणाला, “चिडक्या, भावुक…”

सायली-अर्जुनची समजूत काढून सगळ्या मुली सारख्या नसतात असं त्याला सांगणार आहे याशिवाय त्याला जोडीदाराचं महत्त्व पटवून देणार आहे. सायली अर्जुनला सांगते, “आपल्या आयुष्यात जोडीदार फार महत्त्वाचा असतो सर, सगळ्या मुली सारख्या नसतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं की, एखादी छानशी मुलगी पाहून लग्न करा.”

हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अनघाला मालिकेतील ‘या’ कलाकाराने दिलं हटके गिफ्ट! अभिनेत्री म्हणाली, “आणखी एक…”

सायलीचं बोलणं ऐकून अर्जुनला काहीच सुचत नसतं. कारण, सायलीप्रमाणे इतर कोणतीच मुलगी आपल्याला समजून घेणार नाही याबद्दल त्याच्या मनात खात्री असते. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. एकंदर अश्विन प्रकरणामुळे अर्जुनला सायलीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल का? ठरलं तर मग मालिकेत आगामी भागात आणखी काय ट्विस्ट येणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Story img Loader