‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकताच वटपौर्णिमा विशेष भाग पार पडला. एकीकडे अर्जुन-सायलीचं नातं बहरत असताना दुसरीकडे साक्षीने केलेल्या गंभीर आरोपांचा तणाव सुभेदार कुटुंबीयांवर कायम आहे. अर्जुन आणि चैतन्यवर साक्षी शिखरेने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. या साक्षीने केलेल्या आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी अर्जुन आणि चैतन्यला कोर्टाकडून मुदत दिलेली असते. या सगळ्या प्रकारामुळे महिपतची देखील जामिनीवर सुटका होते. एकंदर अर्जुनची या सगळ्या प्रकरणात प्रचंड चिडचिड होत असते.

अर्जुन आणि चैतन्यला चौकशीसाठी पॅनलसमोर बसवण्यात येतं. यावेळी साक्षीने केलेले आरोप खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत तर, पुढच्या गोष्टी कठीण आहेत अशी ताकीद या दोघांना दिली जाते. अर्जुन यावेळी तुम्ही सगळे निर्णय ठरवूनच आला आहात का? असा प्रतिप्रश्न या पॅनला विचारतो. चैतन्यच्या मनात यावेळी अपराधीपणाची भावना असते. साक्षीने आरोप केल्यापासून अर्जुन आपल्या चुकीमुळे या सगळ्यात अडकला असल्याचं चैतन्यला कायम वाटत असतं. त्यामुळे आता आपल्या जवळच्या मित्रासाठी तो मोठा त्याग करणार आहे.

Man Dhaga Dhaga Jodte Nava Marathi Serial taking 6 years leap new promo out
Video: “आनंदी कुठे गेली?”, ‘मन धागा धागा जोडते नवा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मालिका घेणार ६ वर्षांचा लीप
Tharla tar mag new promo purnaaji see pratima appearance in sayali, priyas plan to dominate raviraj fails
ठरलं तर मग: पूर्णाआजीला सायलीमध्ये दिसणार प्रतिमाचं रूप! मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो
tharala tar mag new episode sayali warns arjun to do not drink coffee
ठरलं तर मग : सायली अर्जुनची घेणार शाळा! सोज्वळ सुनेचा नवा अवतार पाहून कल्पनाही झाली थक्क, पाहा नवीन प्रोमो
marathi serial trp list
TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये असणारी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल, तर दुसऱ्या स्थानी…
Tharla tar mag new promo arjun sayali chaitanya will find new proof against sakshi in vilas murder case via video recording
ठरलं तर मग: व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार सुरू अन् मिळणार साक्षीविरोधात नवा पुरावा; चैतन्य खेळणार नवी खेळी, पाहा प्रोमो
Saregamapa Little Champs fame Rucha Ghangrekar sing tharala tar mag serial title song
Video: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम ऋचा घांगरेकरने गायलं ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षकगीत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
virat kohli daughter vamika biggest concern after India won t20 worldcup
“खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

हेही वाचा : या आठवड्यात OTT वर रिलीज झालेले चित्रपट अन् वेब सीरिजची यादी, आमिर खानच्या मुलाचा पहिला सिनेमा घरीच पाहता येणार

साक्षीनंतर आता येत्या भागात चैतन्य पत्रकार परिषद घेत असल्याचं पाहायला मिळणार आहे. यावेळी तो साक्षी शिखरे प्रकरणात अर्जुन सुभेदार यांचा काहीच संबंध नाही असं मीडियासमोर सांगतो आणि सगळे आरोप स्वत:च्या अंगावर घेतो. ही पत्रकार परिषद सुभेदार कुटुंबीय एकत्र पाहत असतात. चैतन्यने घेतलेला एवढा मोठा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली-अर्जुनचे डोळे पाणावतात. यावेळी रविराज किल्लेदार सुद्धा सुभेदारांच्या घरी उपस्थित असतात. चैतन्यने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे अर्जुन समोरच्या समस्या नाहीशा होऊन तो पुन्हा एकदा मधूभाऊंच्या केसमध्ये लक्ष घालू शकतो.

हेही वाचा : मुग्धाने केलं कीर्तन तर, तबल्याच्या साथीला प्रथमेश! लग्नाला ६ महिने पूर्ण होताच गायिकेने शेअर केला खास व्हिडीओ

आता अर्जुन चैतन्यला याबद्दल काय बोलणार आणि मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. अर्जुन-चैतन्यमध्ये असलेल्या खऱ्या मैत्रीचं दर्शन यानिमित्ताने मालिकेच्या लाखो चाहत्यांना होणार आहे. साक्षीला या दोघांना कोंडीत पकडायचं असतं. परंतु, चैतन्यच्या कबुलीमुळे तिचाही प्लॅन मोडून पडणार आहे. आता अर्जुन… महिपत आणि साक्षीचा हा खोटेपणा कोर्टासमोर कसा उघड करणार आणि मधुभाऊंची केव्हा सुटका होणार? या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या मनात आतुरता निर्माण झाली आहे.