‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. नवनवे ट्विस्ट आणि रंजक कथानकामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरीने ‘सायली’आणि अभिनेता अमित भानुशालीने ‘अर्जुन’ हे पात्र साकारले आहे. मालिकेत सध्या सायलीच्या मंगळागौरीच्या सीक्वेन्सचं शूटिंग सुरु आहे. याच निमित्ताने अमित भानुशालीने मीडियाशी संवाद साधत सेटवरचे काही किस्से सांगितले.

अमित भानुशालीला ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत अभिनेता म्हणाला, “मालिकेच्या सेटवर खूप जास्त रिटेक कोणीही घेत नाही कारण, मालिकेतील सगळेच कलाकार दिग्गज आहेत, ते सगळे खूप चांगले आणि जुने कलाकार आहेत. त्यातल्या त्यात मी मराठी मनोरंजनसृष्टीत नवीन आहे. त्यामुळे मीच एक-दोन रिटेक इतरांपेक्षा जास्त घेतो.”

Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”

हेही वाचा : “मुंबईकरांसाठी नाश्ता, रात्रीचं जेवण हे सगळं…”, प्रसाद ओकने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

अमित भानुशाली पुढे म्हणाला, “मालिकेतील माझे सगळे सहकलाकार खूपच चांगले आहेत. कथेनुसार माझे आणि सायलीचे सगळ्यात जास्त एकत्र सीन्स असतात. त्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना सांभाळून घेतो. आता अनेक दिवस एकत्र काम केल्यामुळे सगळ्याच सहकलाकारांशी एक छान नातं तयार झालं आहे.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे लवकरच झळकणार हिंदी चित्रपटात, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे नुकतेच २०० एपिसोड्स पूर्ण झाले होते. पहिल्या दिवसापासून या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका कित्येक महिने आघाडीवर आहे. जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, प्रियांका तेंडोलकर, मोनिका दाभाडे, सागर तलशीकर, शिल्पा नवलकर हे कलाकार मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

Story img Loader