Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या एकीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाची लग्नसराई सुरू असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. तर, दुसरीकडे सायली सुद्धा अर्जुनशी पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. ऐनवेळी प्रियाची खोड मोडून सायली आपल्याच नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करण्यास सज्ज झाली आहे. यासाठी तिला येत्या काळात कोण-कोण कशी मदत करणार आहे हे जाणून घेऊयात…

सायलीच्या मदतीसाठी सर्वात आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत अद्वैत आणि कला आले होते. या दोघांनी मिळून प्रियाच्या हातावर शेणाची मेहंदी लावण्याचा प्लॅन केला होता. यानंतर सायलीसाठी आणखी राया आणि मंजिरीने खास पंढरपुरातून हिरव्या बांगड्यांचा चुडा आणला होता. महासंगीत सोहळ्यात सायलीच्या पाठीशी नंदिनी ठामपणे उभी राहिल्याचं पाहायला मिळालं. आता येत्या काळात तिच्या मदतीसाठी आणखी दोन पाहुण्या मालिकेत प्रवेश करणार आहेत.

Gharoghari Matichya Chuli
Video : ‘श्री व सौ’ स्पर्धेत जानकी ऐश्वर्याचा खोटेपणा उघड करणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Saif Ali Khan on knife attack Taimur asked me if I was going to die
हल्ल्यानंतर करीनाऐवजी ८ वर्षांचा तैमूर रुग्णालयात सोबत का आला? सैफ अली खानने सांगितलं कारण
Sakha Maza Pandurang new serial coming soon on sun marathi
Video: पांडुरंग हरी…; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार नवी मालिका, ‘शिवा’मधील ‘हा’ कलाकार झळकणार, पाहा जबरदस्त प्रोमो
Prashant Kishor on AAP loss In Delhi Election result 2025
Prashant Kishor on AAP loss : दिल्ली निवडणुकीत केजरीवालांच्या ‘आप’चा पराभव का झाला? राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सांगितली कारणे
tharla tar mag fame monika dabade announce pregnancy
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री लग्नाच्या ९ वर्षांनंतर होणार आई! फोटो शेअर करत दिली गुडन्यूज; होतोय शुभेच्छांचा वर्षाव
tharala tar mag sayali slaps priya watch promo
प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो
kapil sharma
कपिल शर्मा यशस्वी झाल्यानंतर अहंकारी झाल्याच्या दाव्यांवर सहकलाकाराचे वक्तव्य; म्हणाला, “५ टक्केसुद्धा…”

‘ठरलं तर मग’ मालिकेत ‘तू ही रे माझा मितवा’ फेम ईश्वरी आणि नम्रता येणार आहेत. या दोघींच्या हुशारीमुळेच सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागणार आहे. ईश्वरी आणि नम्रता या दोघीही अचानक अर्जुन आणि प्रियाच्या हळदी सोहळ्यात जातात. त्या दोघीही अर्जुनला हळद लावतात. त्यानंतर, मोठ्या हुशारीने हळदीची भांडी बदलून सायलीसाठी अर्जुनची उष्टी हळद घेऊन जातात.

नवऱ्याची उष्टी हळद आल्याचं पाहून सायलीचा आनंद गगनाच मावेनासा होतो. १० फेब्रुवारीपासून हा सीक्वेन्स मालिकेत सुरू होणार आहे. याशिवाय आजपासून ( १० फेब्रुवारी ) वाहिनीवर एक मोठा बदल होणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका आता ८:३० ऐवजी ८:१५ वाजता सुरू होईल. ही मालिका आता पाऊण तास प्रसारित केली जाणार आहे.

दरम्यान, प्रियाने कितीही प्रयत्न केले तरीही अखेरीस अर्जुनचं लग्न हे सायलीशीच होणार आहे. याबद्दल सांगताना मालिकेतील चैतन्य सांगतो, “प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच होईल. आता ते कधी होईल हे आम्ही आताच सांगू शकणार नाही. मालिकेत सायलीने असं ठरवलंय की, मी लग्न करणार माझ्या नवऱ्याशीच… त्यामुळे मालिकेत माझा हा पूर्ण प्रयत्न असेल की मी तिला हवी ती मदत करेन. यासाठी मी आणि कुसुम पूर्ण प्लॅनिंग करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच घडेल.”

Story img Loader