‘ठरलं तर मग’ मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांची मनं जिंकली. दीड वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा असल्यानं टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका आपलं अव्वल स्थान गाठून आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी लोकप्रिय झाली असून, दर दिवशी मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांना उत्कंठा लागलेली असते.

सध्या मालिकेत काय घडतंय

tharala tar mag new episode updates
ठरलं तर मग : प्रिया चोरणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाइल, अर्जुन रंगेहाथ पकडणार? पाहा प्रोमो
Man Dhaga Dhaga Jodte Nava Marathi Serial taking 6 years leap new promo out
Video: “आनंदी कुठे गेली?”, ‘मन धागा धागा जोडते नवा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मालिका घेणार ६ वर्षांचा लीप
Tharla tar mag new promo purnaaji see pratima appearance in sayali, priyas plan to dominate raviraj fails
ठरलं तर मग: पूर्णाआजीला सायलीमध्ये दिसणार प्रतिमाचं रूप! मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो
marathi serial trp list
TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये असणारी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल, तर दुसऱ्या स्थानी…
tharala tar mag serial completed 500 episodes
TRP मध्ये नंबर १ अन्…; ‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला नवीन टप्पा, निर्माता सोहम बांदेकर म्हणाला…
Tharla tar mag fame Priyanka Tendolkar likes this actor said he is a crush
‘ठरलं तर मग’ फेम प्रियांका तेंडोलकरला आवडतो ‘हा’ अभिनेता, म्हणाली, “तो पळून…”
jui gadkari shared post on rainy season and accident
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सहायक दिग्दर्शकाचा अपघात, आठ दिवस कोमात; जुई गडकरी म्हणाली, “प्लीज गाड्या…”
tharala tar mag new episode sayali warns arjun to do not drink coffee
ठरलं तर मग : सायली अर्जुनची घेणार शाळा! सोज्वळ सुनेचा नवा अवतार पाहून कल्पनाही झाली थक्क, पाहा नवीन प्रोमो

‘ठरंल तर मग’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. या मालिकेत सध्या प्रतिमाच्या मृत्यूचा सीक्वेन्स सुरू आहे. प्रिया आणि नागराजचा प्लॅन यशस्वी होतो आणि रविराजला विश्वास बसतो की, प्रतिमा या जगात नाहीय. त्यामुळे रविराज आणि सुभेदार कुटुंब अत्यंत दु:खात असतं. प्रतिमावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रविराज तिच्या फोटोला हार घालणार इतक्यात सायली प्रतिमाची साडी नेसून येते आणि पूर्णाआजीला सायलीमध्ये प्रतिमाचा भास होतो. पूर्णाआजी सायलीकडे पाहून म्हणते, “हिच्या रूपात मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय. तो हार फोटोला नको घालू या.” हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो.

हेही वाचा… “जाड किंवा बारीक…”, ट्रोल झालेल्या महिलांसाठी सोनाली कुलकर्णीने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोमध्ये प्रतिमाच्या मृत्यूची बातमी कळल्यामुळे सुभेदार कुटुंब आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे रविराज त्याचं अन्न-पाणी सोडतो. या सगळ्या परिस्थितीत सायली त्याला सांभाळून घेते. “अन्नावर ना राग काढायचा असतो ना दु:ख. तुम्ही अशी अन्नाची हेळसांड केलीत, तर प्रतिमा आत्याला ते आवडणार नाही. थोडंसं तरी खाऊन घ्या सर”, असं म्हणून सायली रविराजला घास भरवते.

हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल

नकळत सायलीकडून तिच्या खऱ्या बाबांसाठीची काळजी व्यक्त होते. हे बाप-लेकीच्या नात्याचं सत्य कधी उलगडणार याची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. पूर्णाआजीच्या सांगण्यावरून प्रतिमा जिवंत असल्याचा विश्वास सगळ्यांना बसेल का? की प्रिया आणि नागराजचा हा प्लॅन यशस्वी होईल हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.

हेही वाचा… …अन् वरुण धवनने खेचून घेतला पापाराझीचा फोन; अभिनेत्याचा VIDEO व्हायरल होताच नेटकरी म्हणाले…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई गडकरी आणि अमित भनुशाली प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर प्रियांका तेंडोलकर, ज्योती चांदेकर, प्राजक्ता दिघे, चैतन्य सरदेशपांडे, केतकी पालव या कलाकारांच्या निर्णायक भूमिका यात आहेत.