Tharla Tar Mag New Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-प्रियाचे लग्नविधी सुरू असताना लग्नमंडपात अचानक सायली येते असा सीक्वेन्स चालू आहे. सायली बॅण्डवाल्याच्या रुपात लग्नात एन्ट्री घेणार आहे. तिला अचानक आलेलं पाहून सगळेजण विचारत पडतात. सर्वप्रथम सायली सर्वांसमोर कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यानंतर अर्जुनवर प्रेम असल्याचं भर मांडवात मान्य करते. बायकोचे शब्द ऐकताना अर्जुन देखील आनंदी होतो. पण, घरातल्यांसमोर त्याचं काहीच चालत नाही. कल्पना सायलीला, ‘ताबडतोब इथून निघून जा’ अशी ताकीद देते. पण, सायली असं करत नाही.

“गेल्यावेळी तुमच्या विनंतीचा मान देऊन मी निघून गेले पण, आता असं होणार नाही आई…” असं सायली कल्पनाला सांगते. सायलीचे शब्द ऐकून अर्जुन आणखी भारावून जातो. शेवटी सायली सर्वांसमोर अर्जुनला, “तुमचं तन्वीवर ( प्रिया ) प्रेम आहे का?” असं विचारते. यावर अर्जुन नकार दर्शवतो. यामुळे केवळ पूर्णा आजीच्या हट्टाखातर अर्जुन प्रियाशी लग्न करण्यास तयार झालाय हे सत्य सर्वांसमोर येतं.

tharla tar mag sayali arjun married with each other first photo out now
सायलीने लग्न करून दाखवलंच! मंडपात ‘या’ रुपात घेणार एन्ट्री, प्रियाला घडवणार चांगलीच अद्दल; लग्नातील पहिला फोटो आला समोर
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Paaru
हरीश मारुतीला सांगणार पारूबरोबर लग्न न करण्याचे कारण; म्हणाला, ” ते खोटं…”, पाहा प्रोमो
Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
Premachi Goshta serial time change after tejashri Pradhan exit
तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर घसरला टीआरपी अन् आता झाला मोठा बदल, नेमकं काय घडलंय? वाचा…
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
Premachi Goshta
Video : सईला मिळवण्यासाठी मुक्ताचं सावनीला खुलं आव्हान; म्हणाली, “पुढच्या ४ दिवसांत माझी मुलगी…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”

सायलीला पाहून प्रिया खूपच संतापते. “सिक्युरिटी गार्ड्स बोलावून घ्या आणि आताच्या आता या सायलीला बाहेर काढा” असा आदेश प्रिया देते. तिच्या म्हणण्यांनुसार काहीजण आतही येतात. पण, याचा काहीच उपयोग होत नाही. शेवटी अर्जुन सर्वांना ओरडून, “माझ्या बायकोला कोणीही हात लावायचा नाही” असं सांगतो. यानंतर सिक्युरिटी गार्ड्स निघून जातात. आता सायली-अर्जुनच्या मदतीला घरातील आणखी एक सदस्य पुढे येणार आहे. ही व्यक्ती म्हणजे प्रतिमा.

अर्जुन-तन्वी लहान असताना पूर्णा आजीला प्रतिमाने दोघांच्या लग्नाचं वचन दिलं असतं. पण, “आता हे वचन मला आठवत नसल्याने कृपा करून या वचनातून मला मुक्त कर” असं प्रतिमा पूर्णाईला सांगते. याशिवाय दुसरीकडे अर्जुन प्रियाला, “ताबडतोब तुझा तमाशा बंद कर…मी इतके दिवस सहन केलं पण आता यापुढे नाही. आता मी लग्न करेन माझ्याच बायकोशी” असं सांगतो. यावेळी अर्जुन सायलीसला घेऊन थेट लग्नविधींसाठी बसतो. अशारितीने मालिकेत सायली-अर्जुनचं लग्न होणार आहे.

दरम्यान, ‘व्हॅलेंटाइन्स डे’च्या दिवशी हा खास भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ठरलं तर मग’ मालिका आता १० फेब्रुवारीपासून रात्री ८.१५ ते ९ वाजेपर्यंत या नव्या वेळेत प्रसारित केली जाते.

Story img Loader