‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२१ साली सुरू झालेल्या या मालिकेने दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. मालिकेतील शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशा अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं. एवढंच नाही तर प्रेक्षकांना ही पात्र आपल्या घरातली वाटू लागली. त्यामुळे मालिका बंद होणार हे कळताच प्रेक्षकांनी ‘मालिका सुरू ठेवा’, ‘मालिकेचा लवकरच दुसरा भाग आणा’, अशा मागण्या केल्या. प्रेक्षकांच्या याच मागण्यांना दाद देत आता ‘स्टार प्रवाह’ने ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आनंदाची बातमी शशांक म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरेने दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा