‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच मालिकेचा गोड शेवट पाहायला मिळणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे.

हेही वाचा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘जलसा’वर; अमिताभ बच्चन यांना बांधली राखी, म्हणाल्या, “भारतातील…”

Madalsa Sharma quits Anupamaa
मिथुन चक्रवर्तींच्या सूनेने सोडली लोकप्रिय मालिका; म्हणाली, “माझे पती अन् सासरे…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
actress spruha joshi made modak on the occasion of ganesh festival video viral on social media
गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
Director Called Me Daughter and Raped said Actress
Kerala Actress : “दिग्दर्शक मला म्हणायचा तू मुलीसारखी आहेस, त्याने वर्षभर बलात्कार केला आणि..”, अभिनेत्रीची आपबिती
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन

२०१९ला सुरू झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्टमुळे चांगलंच खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका अव्वल स्थानावर होती. पण अलीकडे मालिकेत झालेल्या नव्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. तरीही मालिकेने १००० भागाचा टप्पा पार करून आता शेवटाकडे येऊन पोहोचली आहे. त्याचनिमित्तानं मालिकेतील लोकप्रिय पात्र दीपा म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने ‘मज्जा’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलशी संवाद साधला. त्यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘तुझ्यासाठी संपूर्ण मालिकेतील सर्वात चॅलेजिंग आणि जवळचा असा कोणता सीन होता?’

हेही वाचा – बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘या’ पदी नियुक्ती; म्हणाली, “मला…”

हेही वाचा – कुणी म्हणाले वेडे, तर कुणी म्हणाले प्रेरणादायी; अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

यावर रेश्मा शिंदे म्हणाली की, “माझ्यासाठी शेवटचा सीन खूप हा लक्षात राहील. कारण त्याच्या आदल्या रात्री मला झोप येतच नव्हती. मी चार वाजता झोपले. असं नाही की मी विचारत करत बसले वगैरे. मी आईला म्हटलं, माझा शेवटचा कॉल टाइम आला आहे. ते वाचल्यावर मला खूप धक्का बसला. आता इथू पुढे कॉल टाइम येणार नाही. त्यामुळे शेवटचा सीन माझ्या कायम जवळचा राहील.”

हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…

दरम्यान, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ४ ऑगस्टपासून ही मालिका संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळणार आहे.