Tula Shikvin Changlach Dhada : गणेशोत्सव सुरू असल्यामुळे सध्या सर्वत्र उत्साहाच वातावरण पसरलं आहे. सर्वजण भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले आहेत. मालिकांमध्येही बाप्पा विराजमान झाले आहेत. ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकविन चांगलाच धडा’मध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ या जयघोषात सूर्यवंशी कुटुंबात लाडक्या बाप्पाचं विराजमान झालं आहे. पण अशातच बाप्पाच्या नैवेद्यावरून चारुलता व अधिपतीमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेनुसार गणपतीच्या नैवेद्यासाठी आजी तळणीचे मोदक करते. पण त्यावेळेस चारुलता मधे येते आणि भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेत बदल करण्याचा प्रयत्न करते. चारुलता आजीला म्हणते, “त्यांनी परंपरा पाळल्याचं असतील. कारण त्या परंपरा बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता. तो फक्त या घरच्या सुनेलाच असतो आणि या घरची सून मी आहे. त्यामुळे मी ही परंपरा बदलू शकते आणि मी ही परंपरा बदलणार आहे.” म्हणून चारुलता स्वतःच्या हाताने उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार करते. पण यावरून नंतर चारुलता आणि अधिपतीमध्ये वाद होतो. ( Tula Shikvin Changlach Dhada )

tula shikvin changlach dhada

अधिपती रागवून चारुलताला म्हणाला…

सूर्यवंशीच्या घरी गणपतीचं आगमन होतं. सर्वजण बाप्पाची आरती करण्यासाठी लगबग करत असतात. तितक्यात अधिपती म्हणतो, “थांबा. आजीने तळणीचे मोदक केले आहेत ना?” चारुलता म्हणते, “मी उकडीचे मोदक केले आहेत. या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवू या.” पण अधिपती म्हणतो, “आरती होईल, देवाला नैवेद्य दाखवला जाईल, पण तळणीच्या मोदकाचाच.” त्यावर चारुलता म्हणते की, परंपरा कधी ना कधीतरी बदलायच्या असतात. तू थोडा शांत राहा. यावेळी अधिपती रागवून म्हणतो की, या घरची परंपरा आमच्या आईसाहेबांनी घालून दिली आहे. तिच पुढं चालत राहणार. ( Tula Shikvin Changlach Dhada )

दरम्यान, चारुलता पुन्हा आल्यापासून प्रेक्षक तिच भुवनेश्वरी असल्याचं म्हणत आहेत. भुवनेश्वरी चारुलताच्या रुपात नाटक करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण नेमकं काय खरं आणि काय खोटं हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल. ( Tula Shikvin Changlach Dhada )

भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेनुसार गणपतीच्या नैवेद्यासाठी आजी तळणीचे मोदक करते. पण त्यावेळेस चारुलता मधे येते आणि भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेत बदल करण्याचा प्रयत्न करते. चारुलता आजीला म्हणते, “त्यांनी परंपरा पाळल्याचं असतील. कारण त्या परंपरा बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता. तो फक्त या घरच्या सुनेलाच असतो आणि या घरची सून मी आहे. त्यामुळे मी ही परंपरा बदलू शकते आणि मी ही परंपरा बदलणार आहे.” म्हणून चारुलता स्वतःच्या हाताने उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार करते. पण यावरून नंतर चारुलता आणि अधिपतीमध्ये वाद होतो. ( Tula Shikvin Changlach Dhada )

tula shikvin changlach dhada

अधिपती रागवून चारुलताला म्हणाला…

सूर्यवंशीच्या घरी गणपतीचं आगमन होतं. सर्वजण बाप्पाची आरती करण्यासाठी लगबग करत असतात. तितक्यात अधिपती म्हणतो, “थांबा. आजीने तळणीचे मोदक केले आहेत ना?” चारुलता म्हणते, “मी उकडीचे मोदक केले आहेत. या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवू या.” पण अधिपती म्हणतो, “आरती होईल, देवाला नैवेद्य दाखवला जाईल, पण तळणीच्या मोदकाचाच.” त्यावर चारुलता म्हणते की, परंपरा कधी ना कधीतरी बदलायच्या असतात. तू थोडा शांत राहा. यावेळी अधिपती रागवून म्हणतो की, या घरची परंपरा आमच्या आईसाहेबांनी घालून दिली आहे. तिच पुढं चालत राहणार. ( Tula Shikvin Changlach Dhada )

दरम्यान, चारुलता पुन्हा आल्यापासून प्रेक्षक तिच भुवनेश्वरी असल्याचं म्हणत आहेत. भुवनेश्वरी चारुलताच्या रुपात नाटक करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण नेमकं काय खरं आणि काय खोटं हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल. ( Tula Shikvin Changlach Dhada )