Bigg Boss Marathi 5 च्या घरातून वर्षा उसगांवकर नुकत्याच बाहेर पडल्या आहेत. शोमधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगांवकरांनी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत कोणत्या गोष्टीची खंत आहे, असे म्हटले आहे.

काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

अभिनेत्री वर्षा उसगांवकरांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी म्हटले, “मला आता छान मोकळं वाटतंय. बिग बॉसच्या घरात नाही म्हटलं तरी दडपण असतं, तर आता त्या दडपणाखाली मी निश्चितच नाही. परफॉर्मन्सचं दडपण असतंच, आपला खेळ प्रत्येक दिवशी चांगला असलाच पाहिजे. आपण काहीतरी कटेंट देऊ शकलो पाहिजे. पण, काहीतरी निरर्थक कटेंट देण्यात काही अर्थ नव्हता, त्यामुळे मी तसं कधी केलं नाही. त्यामुळे आता चांगलं वाटतंय पण अर्थात मला खंत आहे की, मी फायनलिस्ट होऊ शकले नाही. कारण मी जिंकण्याच्या ईर्षेने गेले होते. बरं जिंकले नाही तरीसुद्धा फायनलिस्ट होणं, माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि ते राहून गेलं. कोणत्याही एखाद्या मॅचमधून एखादा खेळाडू परत जातो तेव्हा असं वाटतं की हाता-तोंडाशी आलेला घास गेला. तसंच मला आता वाटत आहे.”

Delhi Police
Delhi Police : “आज त्याला संपवूया”, कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
gambler man dies after jumped from second floor of the building over police action fear svk 88 zws
पुणे: जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा पडताच दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी, उपचारादरम्यान मृत्यू
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा
monkeypox case confirmed in kerala
Monkeypox : केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; गेल्या आठवड्यात यूएईवरून भारतात झाला होता दाखल
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
Pune, girl died drowning pune, water tank pune,
पुणे : पाण्याच्या टाकीत बुडून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

तुम्ही घरात शांतपणे खेळलात, कधी तलवार काढावी, शांतपणे खेळणं बंद करावं असं कधी वाटलं का? यावर वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “असं मला कधीच वाटलं नाही. का कोणास ठाऊक? घरातील बऱ्याच सदस्यांना आवाजाची देणगी आहे. धनंजय आहे, तो कोकलतच असतो. निक्कीसुद्धा तशीच आहे. आणखी बऱ्याच जणांना तशीच सवय आहे. त्यामुळे कधी कधी अशी खंत वाटायची की आपला आवाज जरा चढा असता, तर तलवार काढायला उपयोग झाला असता. पण माझी ती देहबोलीच नाहीये मुळात. ती नाहीये तर कुठून आणू. करू शकले असते पण तो अभिर्भाव झाला असता. तसं केलं असतं तर ते नाटक वाटलं असतं, असं मला वाटतं”, असे वर्षा उसगांवकरांनी म्हटले आहे.

हेही वाचा: आयुष्यात सुनीता असूनही ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेला गोविंदा, रागात साखरपुडाही मोडला होता अन्…

दरम्यान, बिग बॉसचे पाचवे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आहे. आता कोणता स्पर्धक जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.