ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी(१८ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सत्तरच्या दशकात दूरदर्शनवर गोड हसरा चेहरा आणि आपल्या मधाळ आवाजातील निवेदनाने ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ त्यांनी गाजवला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तबस्सूम यांच्या एका कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरू होते. काही भागांचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. उर्वरित भागांचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी त्यांना पुन्हा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

Akola, vehicle vandalism, Jai Malokar, heart attack, MNS, vehicle attack, Raj Thackeray, NCP, police action, stress, allegations, death, protest, Amol Mitkari,MNS,NCP,AKola,maharashtra navnirman sena,
अमोल मिटकरी वाहन हल्ला प्रकरणातील मनसैनिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
vilas lande letter, vilas lande, Sharad Pawar,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या माजी आमदाराचे भाजपा श्रेष्ठीला पत्र
chaturang , infidelity
ईतिश्री : थोडीसी बेवफाई?
Smriti Singh | स्मृती सिंग
“स्मृती सिंग यांनी प्रेमाच्या नावाखाली…”, शहीद अंशुमन सिंग यांच्या वडिलांचा गंभीर आरोप!
Influence of Trigrahi Yoga these three zodiac signs
सात दिवसांनंतर पैसाच पैसा! त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘हे’ तीन राशीधारक कमावणार पद, प्रतिष्ठा अन् पैसा
Lal krishna Advani Death Viral News
Fact check: लालकृष्ण अडवाणींच्या निधनाची पोस्ट व्हायरल; भाजपा नेत्यांनीही आधी वाहिली श्रद्धांजली मग कळलं सत्य
ganesh naik marathi news
मंदा म्हात्रे यांच्या कार्यक्रमाला गणेश नाईक समर्थकांची दांडी
captain anshuman singh smriti singh viral video
शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर किर्ती चक्र; वीरपत्नीनं सांगितला अखेरचा संवाद, म्हणाल्या, “आम्ही पुढच्या आयुष्याचे…”

हेही वाचा >> ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, निधन झाल्यानंतर दोन दिवस याबाबतची माहिती द्यायची नाही, अशी तबस्सूम यांची इच्छा होती. तबस्सूम यांचा मुलगा होशांग म्हणाला, “सर्दी, खोकला झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आतड्यांचाही त्रास जाणवू लागला होता. शुक्रवारी रात्री ८:४० वाजता हृदयविकारचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. निधन झाल्यानंतर दोन दिवस याबाबतचे वृत्त द्यायचे नाही, अशी तिची शेवटची इच्छा होती”.

आणखी वाचा >> व्हीलचेअरवर बसून तबस्सूम शो होस्ट करत असतानाच आग लागली अन्…; अमिताभ बच्चन यांनी वाचवलेला जीव

१९४७ साली वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘नर्गिस’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर ‘बैजू बावरा’ चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दूरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचालन केले होते. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’, ’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केलं आहे.