छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षक नित्यनियमाने बघत असतात. कलर्स वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका आता लवकरच निरोप घेणार आहे. या निमित्ताने मालिकेच्या लेखकाने भावूक पोस्ट शेअर केली आहे. ती मालिका म्हणजे राजा ‘राजा राणीची गं जोडी’, या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होत. मालिकेचे शेवटचे दोन दिवस आहेत. लेखक, दिग्दर्शक , अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

चिन्मय मांडलेकर गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने असं म्हंटल आहे, ‘आपली काही काम आपल्याला खूप आवडतात. ‘राजा राणीची गं जोडी’च जग माझ्यासाठी तसंच आहे. रणजित संजू खूप मिस करेन. ४ वर्ष आणि ८२३ भागांचा हा प्रवास फारच विलक्षण होता. खूप प्रेम आणि आभार’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Saba Azad
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्याने काम करण्याची गरज नाही, असे म्हणणाऱ्या नेटकऱ्याला सबा आझादचं सडेतोड उत्तर; म्हणाली, “अंकलजी, लोक प्रेमात…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Anjali Damania on Shashtri
Anjali Damania : “अतिशय आदरपूर्वक मला…” महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!

नाना पाटेकरांचे ओटीटी विश्वात पदार्पण; दिग्दर्शक प्रकाश झा यांच्याबरोबर पुन्हा करणार काम

या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मनिराज पवार हे मुख्य भूमिकेत आहेत सर्वसामान्य मुलगी ते आयपीएएस संजू असा विलक्षण प्रवास प्रेक्षकांनी बघितला आहे. या मालिकेतील रणजित आणि संजू यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होत. ही मालिका संपत असल्याने साहजिकच या मालिकेचे चाहते नाराज झाले आहेत.

चिन्मय मांडलेकरने मालिकेची कथा लिहली होती. रणजित आणि संजुची प्रेमकथा यात दाखवण्यात आली होती. या मालिकेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शनने केली आहे. चिन्मय मांडलेकरने याआधी ‘तू तिथे मी’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तू माझा सांगाती’, या मालिकांचे लेखन केले आहे.

Story img Loader