छोट्या पडद्यावरील मालिकांच्या प्रेक्षकवर्गात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संध्याकाळी ७ ते रात्री १०-११ वाजेपर्यंत घरोघरी मराठी मालिका पाहिल्या जातात. सध्या स्टार प्रवाह, झी मराठी आणि कलर्स मराठी या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी चढाओढ सुरू आहे. टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर ८ ऑगस्ट २०२२ पासून ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सुरू झाली होती. सुरूवातीला ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित केली जायची. यानंतर वाहिनीने २५ सप्टेंबर २०२३ पासून या मालिकेची वेळ बदलून रात्री ८.३० अशी केली. परंतु, आता दोन महिन्यांतच या मालिकेच्या वेळेत पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे.

imd predict after above average rainfall severe cold weather in maharashtra
जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
indian meteorological department predicts heavy rains in maharashtra
Maharashtra Weather Update: महत्वाची कामे हाती घेताय….? पण, मुसळधार पाऊस पुन्हा…..
Laborers working under Mahatma Gandhi Rojgar Guarantee Yojana are in arrears of wages since two months
रोहयोतील कामाच्या मजुरीची दोन महिन्यांपासून प्रतिक्षा; केंद्रासह राज्य सरकारकडे रक्कम थकीत
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
Neeraj chopra qualified for the Diamond League Finals sport news
नीरज डायमंड लीग अंतिम फेरीसाठी पात्र

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत होणार एन्ट्री! साकारणार महत्त्वाची भूमिका

येत्या २७ नोव्हेंबरपासून ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दोन महिन्यांत मालिकेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यामागचं काय कारण आहे? याबद्दल गेले काही दिवस प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होती. अखेर मालिकेच्या वेळेत बदल करण्याचं कारण आता समोर आलं आहे.

‘जाऊ बाई गावात’ या नव्या शोसाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी अर्थात प्रेक्षकांचा लाडका राणादा पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार आहे. हा नवा शो २७ नोव्हेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रक्षेपित करण्यात येणार असल्याने ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे.

हेही वाचा : “अखेरचा हा तुला दंडवत…” ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्रीची भली मोठी भावुक पोस्ट, म्हणाली…

दरम्यान, ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत कश्यप परुळेकर,पल्लवी पाटील आणि अनिता दाते-केळकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारत आहेत. मात्र आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांना नव्या वेळेत रात्री दहा वाजता पाहायला मिळणार आहे.