‘पारू'(Paaru) मालिकेतील किर्लोस्कर कुटुंब हे सधन आहे. त्यांची मोठी संपत्ती आहे. मोठ्या कंपनीचे हे कुटुंब मालक आहेत. त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची मालकीण होण्यासाठी दिशाला किर्लोस्कर घराची सून व्हायचे होते, त्यासाठी तिने एक योजना आखली होती. अहिल्यादेवी व श्रीकांत यांचा लहान मुलगा प्रीतमबरोबर लग्न करायचे आणि किर्लोस्कर घराची सून व्हायचे. मात्र, प्रीतमचे तिच्यावर प्रेम नव्हते. दिशा सर्वांसमोर त्याला चांगली वागणूक देत असे आणि इतरवेळी ती त्याचा वाईट पद्धतीने अपमान करत असे. तिचे हे सत्य अनेकदा सांगण्याचा प्रीतमने प्रयत्न केला, मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्याचदरम्यान प्रीतमच्या आयुष्यात प्रियाची एन्ट्री झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आदित्य व पारूने दिशाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी आणि प्रीतम व प्रियाचे लग्न लावून देण्यासाठी मेहनत घेतली. ऐन लग्नात त्यांनी दिशाचे खरे रूप सर्वांसमोर उघड केले. त्यानंतर अहिल्यादेवीने तिला शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात पाठवले आणि प्रीतम व प्रियाचे लग्न लावून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा