संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए’विरोधात देशभर हिंसक आंदोलने झाली होती. त्यावेळी बऱ्याच सेलिब्रिटीजनीदेखील याला चांगलाच विरोध केला होता.

आता हा कायदा लागू झाल्यावर तमिळ अभिनेता आणि ‘तमिलागा वेट्री कडगम (टीवीके)’ पार्टीचा नेता थलपति विजय याने सीएए विरोधात भाष्य केलं आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या निवेदनात थलपथी विजय म्हणाला की, “सीएएची अंमलबजावणी मान्य नाही. ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक एकत्र आनंदाने रहात आहेत, तेथे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही.”

rahul gandhi criticized narendra modi
कंगना रणौत यांच्या माफीनाम्यानंतर राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना इशारा; म्हणाले, “जर पुन्हा कृषी कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर…”
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
school girl murdered in dahod gujarat
Gujarat Crime: धक्कादायक! पहिलीच्या चिमुकलीवर शाळा मुख्याध्यापकाचा बलात्काराचा प्रयत्न; विरोध केला म्हणून गळा दाबून केली हत्या
ulta chashma, president appointment
उलटा चष्मा : अध्यक्ष नेमणे आहे
campaign against encroachment and Illegal hoardings in Sangli
सांगलीत बेकायदा फलक, अतिक्रमणाविरुद्ध मोहीम
Bajrang Punia threatened to quit Congress
Bajrang Punia Threat : ‘बजरंग काँग्रेस सोड अन्यथा…’, बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी; FIR दाखल
CM bhagwant mann AAP Punjab
Punjab AAP: मोफत देण्याच्या घोषणा ‘आप’च्या अंगलट; पंजाबमध्ये विजेवरील अनुदान रद्द, इंधनावरही कर
NRC application for adhar card
आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

आणखी वाचा : ‘JNU’वर लवकरच येणार चित्रपट; रवी किशन आणि उर्वशी रौतेला यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू करू नये, अशी विनंती विजयने तामिळनाडू सरकारला केली. या कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची राजकारण्यांनी खात्री करावी, असेही विजयने त्याच्या निवेदनात नमूद केले आहे. विजय व्यतिरिक्त, इतर विरोधी नेत्यांनीही नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे नियम अधिसूचित केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच भाजप निवडणुकांपूर्वी समाजात फूट पाडण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनीही या कायद्याचा विरोध केला आहे. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात ‘सीएए’चे आश्वासन दिले होते. त्यानुसार, २०२४ च्या निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर ‘सीएए’ लागू केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. सीएएमुळे देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध राज्यांमध्ये या कायद्याला तीव्र विरोध झाला होता. देशभर हिंसक विरोध होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली होती.