प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण काय? ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ या ठिकाणी गळफास घेऊन घेऊन नितीन चंद्रकांत देसाईंनी आयुष्य संपवलं आहे. बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकत ठेवणाऱ्या या कला दिग्दर्शकाच्या आयुष्याचा असा शेवट झाल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोक कळा पसरली आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आठवणी अनेक कलाकार सांगत आहेत. अशात नितीन चंद्रकांत देसाईंच्या शेवटच्या फेसबुक पोस्टनेही लक्ष वेधलं आहे.

काय आहे नितीन देसाईंची शेवटची फेसबुक पोस्ट?

मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी असं म्हणत हॉटस्टारवर येणाऱ्या आणि महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टिझर नितीन देसाई यांनी २६ जानेवारी रोजी पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी कुठलीही पोस्ट त्यांच्या फेसबुकवर केलेली नाही. आज त्यांच्या मृत्यूचं वृत्त समोर आलं. त्यामुळे हीच त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट ठरली आहे

Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
Music release of the movie Naad in the presence of Prasad Oak
प्रसाद ओकच्या उपस्थितीत ‘नाद’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन
Navra Maza Navsacha 2 loksatta latest news
पुन्हा एकदा मनोरंजनाचा प्रवास, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील कलावंत ‘लोकसत्ता’ कार्यालयात
allegations on Arindam Sil
दिग्दर्शकानं मांडीवर बसवून बळजबरी किस केलं; अभिनेत्रीचा आरोप

https://fb.watch/m9EaFtMJII/

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महाराष्ट्रातील सर्व राजकारण्यांशी नितीन देसाई यांचे चांगले संबंध होते. नितीन देसाई हे इंडस्ट्रीतलं मोठं नाव आहे. ८० च्या दशकात नितीन देसाई यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या सिनेमाने नितीन देसाई यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला होता. पुढे अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं.

नितीन देसाई यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं त्यांनी त्यांचं स्वप्न साकार केलं होतं. कला दिग्दर्शन सारख्या वेगळ्या क्षेत्रात नितीन देसाई यांनी मोलाचं काम केलं आहे. गेल्या ३० वर्षांतल्या अनेक सिनेमांच्या कलादिग्दर्शनाची धुरा नितीन देसाई यांनी सांभाळली आहे. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे त्यांनी केले आहेत. कला दिग्दर्शन या क्षेत्राला ग्लॅमर मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

ऐतिहासिक चित्रपट आणि मालिका म्हणजे नितीन देसाई यांचे कला दिग्दर्शन आणि भव्य सेट्स हे समीकरणच बनले होते. पुढे हेच ऐतिहासिक सेट्स आणि कलात्मक वस्तू एकत्र करत त्यांनी २००५ मध्ये कर्जत येथे भव्यदिव्य एन. डी. स्टुडिओ उभारला. चित्रपटातील भव्य दिव्य सेट्सची ही अद्भुत दुनिया एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी सर्व सामान्यांनाही खुली करून दिली होती. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरलेल्या नितीन देसाई यांनी संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाबरोबर काम केले होते. राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक मालिकेबरोबरच बालगंधर्व या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.