बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्या ‘लायगर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अखेरीस हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला फटका बसणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात मात्र असंच काहीसं घडताना दिसत आहे. अनन्याची या चित्रपटामधील भूमिका पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही फ्लॉप ठरला. या चित्रपटामुळे विजय देवरकोंडाला मात्र मोठा फटका बसला आहे.

विजय देवरकोंडाचा चाहतावर्ग फार मोठा आहे. ‘लायगर’ला मिळालेल्या अपयशामुळे त्याला मात्र नुकसान सहन करावं लागत आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, विजयचा आगामी चित्रपट ‘जन गण मन’चं काम आता पूर्णपणे बंद पडलं आहे. ‘लायगर’चे दिग्दर्शक जगन्नाथ पुरीचं या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते.
आणखी वाचा-अल्लू अर्जुनच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती; ‘या’ कारणामुळे होतंय सर्वत्र कौतुक

Two tigers fight both locked in ferocious fight tourists recorded shocking video goes viral
VIDEO: लढाई अस्तित्वाची! जेव्हा दोन वाघ समोरा-समोर येतात तेव्हा काय घडतं? पर्यटकांनीच रेकॉर्ड केला थरारक प्रकार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Image Of Bajran Sonawane
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, बजरंग सोनावणे म्हणाले, “आरोपींना पैसे पुरवणारे…”
Shubman Gill Throws Bat in Anger After Controversial Dismissal in Ranji Trophy
Ranji Trophy: शुबमन गिल वादग्रस्तरित्या बाद झाल्यानंतर संतापला, हवेत फेकली बॅट अन् डोक्याला…, VIDEO व्हायरल
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले

या चित्रपटाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर २०२३मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र आता असं काहीच घडणार नसल्याचं समोर आलं आहे. देशभरात ‘लायगर’ने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये फक्त ३५ कोटी रुपये कमाई केली. ही कमाई सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेमध्ये फारच कमी होती. १०० कोटी रुपयांचा बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला.

आणखी वाचा- “हिंदी चित्रपट करणं इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण… ” विजय देवरकोंडाने केला होता खुलासा

चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे निर्मात्यांना देखील आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. म्हणूनच विजय नुकसान भरपाई म्हणून ‘लायगर’चे निर्माते चार्मी कौर आणि इतर सह निर्मात्यांना आपल्या कमाईमधील काही पैसे देणार आहे. ही रक्कम ६ कोटी रुपये असणार असल्याचं बोललं जात आहे. ‘जन गण मन’ चित्रपटाचं काम ठप्प झाल्यानंतर विजय समांथा प्रभुबरोबर नव्या तेलुगू चित्रपटात काम करताना दिसेल.

Story img Loader